शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

देशातील ३८ हजार तृतीयपंथींना आधारकार्ड

By admin | Updated: September 27, 2014 06:05 IST

देशात सुमारे ४९ कोटी तृतीयपंथी असल्याचे सर्वेक्षणाद्वारे उघड झाले आहे

सुरेश लोखंडे, ठाणेदेशात सुमारे ४९ कोटी तृतीयपंथी असल्याचे सर्वेक्षणाद्वारे उघड झाले आहे. यातील सुमारे ३८ हजार जणांना आधारकार्ड देण्यात आल्याचा दावा केंद्र शासनातर्फे केला जात आहे. ठाण्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने तृतीयपंथींच्या हक्क व अधिकारांसंदर्भात अयोजित केलेल्या शिबिरातून ही माहिती उघड झाली आहे. देशातील तृतीयपंथींना अधिकार व हक्कांसह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानुसार, केंद्र शासनासह राज्य पातळीवर प्रतिनिधी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रतिनिधी समितीवर महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव उज्ज्वल उके यांची विशेष निमंत्रक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. देशातील तृतीयपंथींचे सर्वेक्षण करून केंद्र शासनासह विविध राज्यांद्वारे त्यांना विविध सवलती दिल्या जात आहेत. तृतीयपंथींच्या निवाऱ्याची समस्य दूर करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाच्या राजीव आवास योजनेद्वारे त्यांना घरकुल प्राप्त करून दिले जाणार आहे. तामिळनाडूमध्ये ‘वेल्फेअर बोर्ड’ स्थापन करून सुमारे ४,२९४ जणांची नोंद करून यापैकी ३,३२८ जणांना ओळखपत्र देण्यात आले आहे. १,५४४ जणांना रेशनिंग कार्डवाटप केले आहे. याशिवाय १,०५२ जणांना घरासाठी जागेचे वाटप केले आहे़ १०२ जणांना टेलरिंगचे प्रशिक्षण देऊन शिलाई मशीन दिल्याचे शिबिरात सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद केले आहे.नवी दिल्ली येथील समाज कल्याण विभागाच्या सहायक संचालक कार्यालयाच्या वतीने तृतीयपंथीयांना दरमहा एक हजार रुपये मानधन दिले जात आहे. राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू या राज्यांमध्ये त्यांना पेन्शन लागू केले आहे. याशिवाय, त्यांना ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याचा प्रयत्न केंद्र शासनाद्वारे केला जात आहे. मतदानाचा हक्क देण्यासाठी त्यांची मतदार म्हणून नोंद करण्यात येत आहे. मतदार यादीमध्ये मेल, फिमेल मतदार नोंदणीप्रमाणे त्यांची ‘टी’ (ट्रान्सजेंडर) म्हणून नोंद केली जाणार आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांचा लाभ देण्यासह सोयीसुविधा व निवाऱ्याच्या समस्या केंद्र व राज्य शासनाद्वारे सोडवण्यात येणार आहेत. यासाठी राज्य पातळीवर सल्लागार समितीदेखील गठीत करण्यात आली आहे.