शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का; गंभीर आरोप करत महिला पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 13:34 IST

नाशिकमधील १५-२० महिला पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले.

नाशिक - उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव इथं जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत हे नाशिक, मालेगावात तळ ठोकून आहेत. आजच्या सभेत उद्धव ठाकरे कुणावर बरसणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र मालेगावच्या सभेपूर्वीच ठाकरेंना धक्का बसला आहे. नाशिकमधील महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

नाशिकमधील १५-२० महिला पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. या प्रवेशाबाबत एका महिला पदाधिकाऱ्याने म्हटलं की, उपऱ्या शिवसैनिकांना खरी शिवसेना माहिती नाही. बाहेरचे आणून पदाधिकारी बसवले जातात. शिवसेनेची ध्येय धोरणे माहिती नाही. ५० महिलांनी राऊतांना तक्रार केली. परंतु मर्यादा सोडून दिलेल्यांना बंधनं घातली पाहिजे अशी मागणी केली. परंतु जे नेते आहेत त्यांच्यासोबत राऊतांची देवाणघेवाणीचे व्यवहार असतील म्हणून कारवाई केली नाही. महिला आघाडीत राहून आमच्यावर शिंतोडे टाकून घ्यायचे नाहीत. त्यामुळे महिला आघाडीच्या माझ्यासह ३ जिल्हा संघटक, २ शहर प्रमुख, ३ उपजिल्हाप्रमुख शिवसेनेत प्रवेश करत आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच या सरकारने महिलांसाठी अर्थसंकल्पात अनेक योजना आणल्या. एसटी बसेसमध्ये ५० टक्के तिकीट दरात सवलत दिली. एखादी महिला गरीब असली, झोपडपट्टीत राहत असली तरी तिलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानसन्मान देतात. हाच मानसन्मान आम्हाला महिला आघाडीत मिळत नाही. त्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश करतोय. आम्हाला मानसन्मानच नाही. नाशिकच्या नेत्यांना बोलण्याची पद्धत नाही. व्यासपीठावरून महिलांची लाली-लिपस्टिक काढली जाते, आज आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत. त्यांची कार्यपद्धती आम्हाला आवडते असंही प्रवेश करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. 

उर्दुवर देशात बंदी आहे का?मालेगावमधील उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेसाठी पक्षाकडून मुस्लीम बहुल भागात उर्दू भाषेत बॅनर्स झळकावले आहेत. त्यावरून सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे. त्यावर बोलताना संजय राऊतांनी हे भाजपा, खोकेवाल्यांच्या आयटी सेलचे काम आहे असा आरोप केला. त्याचसोबत उर्दू या देशाची भाषा नाही का? देशात उर्दूवर बंदी आहे का? कालच कुणीतरी जावेद अख्तरांचे कौतुक केले, आम्हीही केले. पाकिस्तानात जाऊन या देशाची भूमिका मांडणारी भाषा ही सुद्धा उर्दू आहे. ज्या जावेद अख्तर, गुलजार यांचे कौतुक करते ते आजही त्यांचे लिखाण उर्दूमध्ये करतात. हा जो काही प्रकार सुरू आहे तो लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे अनेकांची हातभर फाटलीय असं सांगत संजय राऊतांनी मालेगावमध्ये उर्दू भाषेत लागलेल्या बॅनर्सचे समर्थन केले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना