शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 15:49 IST

Maharashtra Politics : राज्याच्या २०२९ ते २०२४ या पाच वर्षाच्या कालावधीतील झालेल्या कामाचा लेखाजोखा एका संस्थेने मांडला आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : २६ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. यामुळे राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. २०१९ ते २०२४ या पाच वर्षाच्या कालावधीत झालेल्या १२ अधिवेशनांमधील प्रश्नांचा अभ्यास आणि विधिमंडळ कामकाजाचा लेखाजोखा मुंबईतील संपर्क संस्थेने  मांडला आहे. याबाबतचा अहवाल या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

या पाच वर्षाच्या कार्यकाळात विधिमंडळात विचारण्यात आलेल्या प्रश्नात महिलांविषय प्रश्नांची दुपटीने वाढ झाली, तर बालकांवरील प्रश्नांत निम्म्याहून अधिक घट झाली आहे. पण, अल्पसंख्या सामजाविषयी फक्त नऊ प्रश्न विचारण्यात आल्याचे समोर आले आहे. या कार्यकाळात आमदारांनी विधिमंडळात ५,९२१ प्रश्न मांडले आहेत. 

मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

तसेच १४ व्या विधानसभेत संपूर्ण पाच वर्षाच्या काळात विधिमंडळ समित्यांचं कामच झालं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आली होती, त्यावेळी विधिमंडळ समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण कोरोनामुळे या समित्यांना काम करता आले नाही. पुढे महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महायुती सरकार सत्तेत आले, यावेळी या सरकारने विधिमंडळ समित्या रद्द केल्या. पण, आतापर्यंत विधिमंडळ समित्या महायुती सरकारने नियुक्त केल्या नसल्याची माहिती या अहवालातून उघड झाली आहे. 

समित्या काय काम करतात?

नव्याने विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर किंवा दरवर्षी विधानमंडळाच्या समित्यांची मुदत संपल्यानंतर नवीन समित्या गठीत करण्याच्या दृष्टीने या सचिवालयातील ड-३ कक्षातून समित्यांवर नियुक्ती करण्याच्या दृष्टीने सत्तारुढ पक्षांच्या सदस्यांची नावे मा. संसदीय कार्य मंत्री यांच्याकडून मागविण्यात येतात. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील सदस्यांची नावे मा. विरोधी पक्ष नेता (विधानसभा, विधानपरिषद) यांच्याकडून मागविली जातात.

एखाद्या सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु झाली असेल आणि त्या चर्चेमधून देखील एखाद्या विषयाला न्याय मिळणार नाही असे वाटत असेल तर सभागृह एखाद्या तदर्थ समितीची घोषणा करते व त्या समितीची कार्यकक्षा ठरवून त्या समितीस ठराविक कालावधी दिला जातो. त्या कालावधीत समितीला संबंधित विषयाची, संबंधित विभागाच्या प्रतिनिधींची साक्ष घेऊन सभागृहाने दिलेल्या विहित मुदतीत त्या समितीला अहवाल सभागृहास सादर करावा लागतो.

यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात या समित्या महत्वाच्या आहेत.

टॅग्स :MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीvidhan sabhaविधानसभा