शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्राथमिकच्या वेळेत बदलामुळे अडचणी वाढणार; माध्यमिक शाळांचे वेळापत्रक कोलमडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 07:07 IST

राज्यात दोन सत्रांत चालणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेची वेळ बदलली तर माध्यमिकचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

- प्रशांत बिडवेलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील शाळांमधील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ विद्यार्थ्यांची झोप पूर्ण व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच स्कूल बसचालक यांच्यासमोरील अडचणींत वाढ होणार आहे.

राज्यात दोन सत्रांत चालणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेची वेळ बदलली तर माध्यमिकचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. शाळांतील वर्गखोल्यांअभावी मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचा प्रश्न निर्माण होईल; तसेच माध्यमिक शाळा उशिरा सुटल्यास विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यभरात इंग्रजी माध्यमांसह मोठ्या संख्येने शाळा दोन सत्रांत चालतात. त्यात प्राथमिक वर्गाची शाळा सकाळी ९ ते २ या कालावधीत भरवल्यास त्यापुढे माध्यमिक शाळांचे वर्ग केव्हा भरविणार? असा सवाल माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे.माध्यमिक वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान उभे राहील. त्यामुळे शाळेची वेळ वाढवावी लागेल आणि त्यानंतर मुला-मुलीना घरी परतण्यास एक ते दीड तासांचा वेळ लागू शकतो. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. 

- सतीश इनामदार, अध्यक्ष, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ

ज्या भागात प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी ९ नंतर भरविणे अशक्य असेल तेथे स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने शाळांच्या वेळेबाबत लवचिकता ठेवणे, तसेच निर्णय घेण्याची मुभा शासन निर्णयात देण्यात आली आहे.- सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त

टॅग्स :Schoolशाळा