शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बाप्पाला निरोप देताना ९ भक्तांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 11:52 IST

मुंबईतील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. काही जण पोलिसांची नजर चुकवून प्रवेश नसलेल्या किनारी आले.

मुंबई : रविवारी राज्यात बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या ९ जणांचा मृत्यू झाला. यापैकी तिघे जण मुंबईत,  पुणे व सोलापुरात प्रत्येकी दोघे, एक जण धुळ्यात तर एक जण बुलडाणा जिल्ह्यातील घटनेत बुडाला.

मुंबईतील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. काही जण पोलिसांची नजर चुकवून प्रवेश नसलेल्या किनारी आले. याच दरम्यान पाच जण समुद्रात बुडाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांना वाचविण्यात यश आले. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. शुभम राजनलाल निर्मल (१८), संजय हिरामन तावडे (२०) या तरुणांंचे मृतदेह पथकाच्या हाती लागले. 

चारबंगला परिसरात राहणारे हिरामन तावड़े (५२) पूर्वी वर्सोवा गावात राहण्यास होते. नुकतेच ते चारबंगला परिसरात शिफ्ट झाले. ते वर्सोवा गावातच कामगार म्हणून काम करतात. ते भाऊ तावड़े म्हणून परिसरात ओळखीचे आहेत. रविवारी बाप्पाच्या विसर्जना दरम्यान बुडालेल्यामध्ये त्यांचा मुलगाही असल्याचे समजताच त्यांनीही समुद्रात उड़ी घेतली. 

ते बुडत असल्याचे लक्षात येताच राकेश सुकाचा आणि सुभाष शिपे  याांनी वाचवले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सोमवारी त्यांचा मुलगा संजय याचा मृतदेह मिळून आला आहे. तावड़े कुटुुंबियांना धक्का बसला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून राज्यात अन्य ठिकाणीही विसर्जनाच्यावेळी बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनdrowningपाण्यात बुडणेGanesh Mahotsavगणेशोत्सव