शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

९५२ किलो कांद्याची पट्टी १ रुपया!

By admin | Updated: May 23, 2016 01:58 IST

रात्रं-दिवस काबाडकष्ट करून काळ्या मातीतून सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्याची सध्या अवहेलना होताना दिसत आहे. शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला ९५२ किलो कांदा विकून फक्त १ रुपया हातात पडला आहे

पुणे / चाकण : रात्रं-दिवस काबाडकष्ट करून काळ्या मातीतून सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्याची सध्या अवहेलना होताना दिसत आहे. शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला ९५२ किलो कांदा विकून फक्त १ रुपया हातात पडला आहे. कांद्याची पट्टी पाहून हा बळीराजा कोसळून गेला असून, स्वत:च्या नशिबाला दोष देत आहे. आता शेतातील कांद्याला ‘कुणी भाव देता का भाव...’ असे म्हणण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही. मारुती परभाणे असे या शेतकऱ्याचे नाव. शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई या गावात त्यांची शेती आहे. त्यांनी चार एकर शेतात कांद्याची लागवड केली आहे. त्यापैकी १० गुंठा शेतातून त्यांनी विक्रीसाठी कांदा काढला. त्यांनी एका टेम्पोमधून दि.१० मे रोजी गुलटेकडी मार्केट यार्डातील पल्लवी ट्रेडिंग कंपनी या आडतदाराकडे कांदा विक्रीसाठी पाठविला होता.मध्यम प्रतीचा एकूण १८ गोणी कांदा होता. त्याचे एकूण वजन ९५२ किलो इतके भरले. या कांद्याला प्रति १० किलोस केवळ १६ रुपये भाव मिळाला. म्हणजेच प्रतिकिलोस १ रुपया ६० पैसे भावाने त्यांच्या कांद्याची विक्री झाली. या मालाची एकूण रक्कम १५२३ रुपये २० पैसे इतकी झाली. त्यामधून आडत ९१ रुपये ३५ पैसे, हमाली ५९ रुपये, भराई १८ रुपये ५५ पैसे, तोलाई ३३ रुपये ३० पैसे तर मोटारभाडे १३२० रुपये असा एकूण १५२२.२० रुपये पट्टीतून कपात करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती फक्त १ रुपया शिल्लक राहिला. परभाणे याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अनेक शेतकऱ्यांना कांदा किंवा इतर शेतमालाच्या विक्रीतून केलेला खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. कांद्याला या आठवड्यात ४०० ते ७०० रुपये असा प्रतवारीनुसार भाव मिळाला. चाकणमध्ये कांद्याची आवक किंचित वाढली. येथील मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक २ हजार २०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने वाढून भाव स्थिर राहिले. कांद्याचा कमाल भाव ७०० रुपयांवर स्थिरावला. सध्या चांगल्या दर्जाच्या कांद्याला प्रति १० किलोसाठी ५० ते ९० रुपये भाव आहे. हा दर शेतकऱ्यांना परवडत नाही. ५० किलोची गोणी बाजारात पाठविण्यासाठी मोटारभाडे, आडत, हमाली, तोलाई आणि भराई या खचार्चा विचार करता किमान ८० ते ९० रुपये गोणीसाठी बाजारखर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० किलोच्या गोणीमागे १०० ते १५० रुपयेदेखील मिळत नाहीत. कांदा सुमार दर्जाचा असेल तर उत्पादन खर्चही निघत नसल्याचे समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून सर्वत्रच कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. पण सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथेकडे पाहायला वेळच नसल्याचे दिसते. (प्रतिनिधी)सध्या चांगल्या दर्जाच्या कांद्यालाही चांगला भाव मिळत नाही. परभाणे यांच्या कांद्याचा आकार लहान होता. त्यामुळे त्याला कमी भाव मिळाला. त्यांच्या गावापासून एका गोणीस ४० रुपये मोटार भाडे आहे. त्यानुसार १८ गोण्यांचे ७२० रुपये एवढेच भाडे होते. मात्र, हुंडेकरीने (मोटारचालक) पाठविलेल्या मेमोमध्ये अतिरिक्त ६०० रुपये लावण्यात आले आहेत. तसेच प्रत्यक्षात कांद्याला १५ रुपये प्रति दहा किलो असा भाव मिळाला होता. त्यामुळे त्यांची पट्टी येणे होत होती. हे पाहून १६ रुपये भाव करण्यात आला. - सुधीर जाधव, आडतदार