शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सात महिन्यांत ८,९०० मृत्यू, राज्यात रस्ते अपघातांत वाढ; मुंबईत घटले, पुण्यात वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 05:19 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघातात १४६  ने तर मृत्यूंमध्ये ३८५ ने  घट झाली आहे, सध्याच्या घडीला राज्यात तीन कोटी ४७ लाख ७३ हजार ६२५ वाहनांची नोंदणी झालेली आहे.

मुंबई : राज्यात रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.  वाढते अपघात आणि त्यातून होणारी प्राणहानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. जानेवारी ते जुलै  २०२३ या  कालावधीत  १९,७१९  अपघात झाले असून या अपघात ८,९०७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अपघात घटले असून पुण्यात वाढले आहेत.गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघातात १४६  ने तर मृत्यूंमध्ये ३८५ ने  घट झाली आहे, सध्याच्या घडीला राज्यात तीन कोटी ४७ लाख ७३ हजार ६२५ वाहनांची नोंदणी झालेली आहे. देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून हे अपघात कमी करण्यासाठी आरटीओसह वाहतूक पोलिस विविध योजना राबवीत आहेत. रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतून प्रवासी वाहतूक करणे, वेगाने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसविणे, गाडी चालवताना मोबाइलचा वापर करणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे ही कारणे आहेत. अपघात आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. 

मुंबईत ५५१ अपघात मुंबईत एकूण ४३ लाखांहून अधिक वाहने आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये ५५१ अपघात झाले असून या अपघातात १४८ जणांचा मृत्यू झाला. २०२२ च्या तुलनेत अपघातात ५९० नी घट, मृत्यूंमध्ये ६४ तर गंभीर जखमींची संख्या ४९२ ने कमी आहे.

पुण्यात ७०५ अपघातपुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघात व मृत्यू वाढले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ४९४ अपघातात १८९ लोकांचा मृत्यू झाला तर ३५२ जण जखमी झाले होते. यंदा सात महिन्यात ७०५ अपघातांत २०५ मृत्यू तर ५०२ जण जखमी झाले.

राज्यातील अपघात आणि अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी विविध पातळीवर काम केले जात आहे. त्यानुसार उपाययोजना केल्या जातात. अपघातानंतर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासोबत अपघाताबाबत जनजागृतीवरही भर दिला जात आहे.-डॉ. रवींद्र सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक)

टॅग्स :Accidentअपघात