शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

८७९६ भूखंडांना उद्योगांची प्रतीक्षा

By admin | Updated: June 7, 2014 22:54 IST

आठ हजार ७९६ भूखंड वितरीत होणे बाकी असल्याचे एमआयडीसीच्या आकडेवारीवरुन दिसून येते.

वाशिम: बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला रोजगार देण्याबरोबरच राज्याचे उद्योग चक्र गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्यभरात ७३ हजार ८५५ भृखंडांचे वितरण केले असून त्यापैकी आठ हजार ७९६ भूखंड वितरीत होणे बाकी असल्याचे एमआयडीसीच्या आकडेवारीवरुन दिसून येते.राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उद्योगासारखे दुसरे सक्षम क्षेत्र नसल्याची शासनाला खात्री पटली आहे. म्हणूनच उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला भूखंड विकसित करुन त्याचे वितरण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. एमआयडीसी क्षेत्रात मोठमोठे उद्योगधंदे निर्माण झाल्यास बेरोजगारांची संख्याही आपसूकच कमी होईल हा उद्देशही यामागे दडला आहे. ज्या विभागात मोठमोठे उद्योगधंदे आहेत, तेथे मोठया प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत असल्याचे आकडेवारी सांगते. दुदैवाने विदर्भात एमआयडीसी क्षेत्रात मोठमोठे उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारांची मोठी फौज तयार होत आहे. २0१२ मध्ये अमरावती, विभागात केवळ १६७१ उद्योगघटक कार्यरत होते. २0१३ मध्ये हा आकडा १८१0 वर पोहचला तर नागपूर विभागात २0१२ मध्ये ३0२४ आणि २0१३ मध्ये ४१७१ उद्योग घटकांची संख्या होती.अमरावती विभागातील एमआयडीसी क्षेत्रात ४९१४ भुखंड विकसित असून ३६0७ भुखंड वितरीत झाले आहेत. कोकण विभागात सर्वाधिक उद्योग घटक अर्थात ११ हजार ७२ आहेत. येथे १९ हजार ५२७ पैकी १७ हजार ३६८ भुखंड वितरीत झाले आहेत.रोजगार निर्मितीत मात्र पूणे विभाग अव्वल आहे. ९ हजार १९८ उद्योग घटकातून तीन लाख ६३ हजार रोजगार निर्मिती झाल्याची साक्ष एमआयडीसी कार्यालयाची २0१३ मधील आकडेवारी देत आहे. अमरावती विभागातील उद्योगधंद्यांनी केवळ २३ हजार बेरोजगारांना रोजगार दिला आहे. राज्यातील औद्योगिक क्षेत्रात इतर विभागाच्या तुलनेत अमरावती विभाग खूप मागास ठरत आहे.