शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

८७९६ भूखंडांना उद्योगांची प्रतीक्षा

By admin | Updated: June 7, 2014 22:54 IST

आठ हजार ७९६ भूखंड वितरीत होणे बाकी असल्याचे एमआयडीसीच्या आकडेवारीवरुन दिसून येते.

वाशिम: बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला रोजगार देण्याबरोबरच राज्याचे उद्योग चक्र गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्यभरात ७३ हजार ८५५ भृखंडांचे वितरण केले असून त्यापैकी आठ हजार ७९६ भूखंड वितरीत होणे बाकी असल्याचे एमआयडीसीच्या आकडेवारीवरुन दिसून येते.राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उद्योगासारखे दुसरे सक्षम क्षेत्र नसल्याची शासनाला खात्री पटली आहे. म्हणूनच उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला भूखंड विकसित करुन त्याचे वितरण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. एमआयडीसी क्षेत्रात मोठमोठे उद्योगधंदे निर्माण झाल्यास बेरोजगारांची संख्याही आपसूकच कमी होईल हा उद्देशही यामागे दडला आहे. ज्या विभागात मोठमोठे उद्योगधंदे आहेत, तेथे मोठया प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत असल्याचे आकडेवारी सांगते. दुदैवाने विदर्भात एमआयडीसी क्षेत्रात मोठमोठे उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारांची मोठी फौज तयार होत आहे. २0१२ मध्ये अमरावती, विभागात केवळ १६७१ उद्योगघटक कार्यरत होते. २0१३ मध्ये हा आकडा १८१0 वर पोहचला तर नागपूर विभागात २0१२ मध्ये ३0२४ आणि २0१३ मध्ये ४१७१ उद्योग घटकांची संख्या होती.अमरावती विभागातील एमआयडीसी क्षेत्रात ४९१४ भुखंड विकसित असून ३६0७ भुखंड वितरीत झाले आहेत. कोकण विभागात सर्वाधिक उद्योग घटक अर्थात ११ हजार ७२ आहेत. येथे १९ हजार ५२७ पैकी १७ हजार ३६८ भुखंड वितरीत झाले आहेत.रोजगार निर्मितीत मात्र पूणे विभाग अव्वल आहे. ९ हजार १९८ उद्योग घटकातून तीन लाख ६३ हजार रोजगार निर्मिती झाल्याची साक्ष एमआयडीसी कार्यालयाची २0१३ मधील आकडेवारी देत आहे. अमरावती विभागातील उद्योगधंद्यांनी केवळ २३ हजार बेरोजगारांना रोजगार दिला आहे. राज्यातील औद्योगिक क्षेत्रात इतर विभागाच्या तुलनेत अमरावती विभाग खूप मागास ठरत आहे.