शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

लातूर जिल्ह्याचा ८६.५३ टक्के निकाल

By admin | Updated: June 7, 2016 07:23 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातून ४० हजार ७२९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले़ पैकी ३५ हजार २४२ उत्तीर्ण झाले़ लातूर जिल्ह्याने ८६़५३ टक्के मिळवीत मंडळात अव्वल क्रमांक पटकाविला आहे़

लातूर : लातूर जिल्ह्यातून ४० हजार ७२९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले़ पैकी ३५ हजार २४२ उत्तीर्ण झाले़ लातूर जिल्ह्याने ८६़५३ टक्के मिळवीत मंडळात अव्वल क्रमांक पटकाविला आहे़ विशेष म्हणजे यंदाही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातून १७ हजार २३४ मलींनी परीक्षा दिली. त्यापैकी १५ हजार ३३७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण मुलांच्या तुलनेत ४.२७ टक्क्यांनी अधिक आहे.जिल्ह्यातून २३ हजार ४९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ९०५ विद्यार्थी पास झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.७२ टक्के असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.९९ आहे.बेस्ट फाईव्ह अन् स्पोर्टस्ने वाढली टक्केवारीसहा अनिवार्य विषय घेऊन परीक्षेस सामोरे जाऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी फुगली आहे. ज्या पाच विषयांचे गुण अधिक आहेत, त्या पाच विषयांचेच एकूण गुण ग्राह्य धरून ५०० पैकी टक्केवारी काढण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील टक्केवारीचा आलेख उंचावला आहे. त्यात स्पोर्टस्च्या गुणांचीही भर पडल्यामुळे तो पैकीच्या पैकींवर गेला आहे. संस्कृत, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आदी विषय गुणांकन वाढविणारे आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर या विषयाचे गुण अन्य विषयांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. याच विषयात बहुतांश विद्यार्थ्यांना ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ म्हणून गुण मिळाले आहेत. शिवाय, २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून खेळाडू विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १०० टक्के गुणांच्या आधीन राहून शासनाच्या निर्णयानुसार खेळाचे गुण देण्यात आले आहेत. १५, २० आणि २५ अशा तीन पद्धतीने गुण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकावर दिसत आहेत. १०० पैकी १०० टक्के मिळण्यासाठी जेवढे गुण कमी आहेत, तेवढे गुण स्पोर्टस् कोट्यातून मिळाले आहेत. ४३० विद्यार्थ्यांना स्पोर्टस् सवलतीतून गुण... लातूर विभागातील लातूर जिल्ह्यातून ४३० विद्यार्थ्यांनी स्पोर्टस् सवलतीचा फायदा उचलला आहे. ३९९ विद्यार्थी शालेय स्पर्धेत सहभाग घेऊन स्पोर्टस् गुणांसाठी पात्र झाले आहेत. तर ३१ विद्यार्थी संघटनेमार्फत आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदवून हे गुण मिळविले आहेत. त्यांच्या बेस्ट फाईव्हची आणि स्पोर्टस्ची बेरीज एकत्र झाल्याने यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे १०० पैकी १०० गुण आले आहेत.