शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

लातूर जिल्ह्याचा ८६.५३ टक्के निकाल

By admin | Updated: June 7, 2016 07:23 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातून ४० हजार ७२९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले़ पैकी ३५ हजार २४२ उत्तीर्ण झाले़ लातूर जिल्ह्याने ८६़५३ टक्के मिळवीत मंडळात अव्वल क्रमांक पटकाविला आहे़

लातूर : लातूर जिल्ह्यातून ४० हजार ७२९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले़ पैकी ३५ हजार २४२ उत्तीर्ण झाले़ लातूर जिल्ह्याने ८६़५३ टक्के मिळवीत मंडळात अव्वल क्रमांक पटकाविला आहे़ विशेष म्हणजे यंदाही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातून १७ हजार २३४ मलींनी परीक्षा दिली. त्यापैकी १५ हजार ३३७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण मुलांच्या तुलनेत ४.२७ टक्क्यांनी अधिक आहे.जिल्ह्यातून २३ हजार ४९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ९०५ विद्यार्थी पास झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.७२ टक्के असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.९९ आहे.बेस्ट फाईव्ह अन् स्पोर्टस्ने वाढली टक्केवारीसहा अनिवार्य विषय घेऊन परीक्षेस सामोरे जाऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी फुगली आहे. ज्या पाच विषयांचे गुण अधिक आहेत, त्या पाच विषयांचेच एकूण गुण ग्राह्य धरून ५०० पैकी टक्केवारी काढण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील टक्केवारीचा आलेख उंचावला आहे. त्यात स्पोर्टस्च्या गुणांचीही भर पडल्यामुळे तो पैकीच्या पैकींवर गेला आहे. संस्कृत, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आदी विषय गुणांकन वाढविणारे आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर या विषयाचे गुण अन्य विषयांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. याच विषयात बहुतांश विद्यार्थ्यांना ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ म्हणून गुण मिळाले आहेत. शिवाय, २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून खेळाडू विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १०० टक्के गुणांच्या आधीन राहून शासनाच्या निर्णयानुसार खेळाचे गुण देण्यात आले आहेत. १५, २० आणि २५ अशा तीन पद्धतीने गुण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकावर दिसत आहेत. १०० पैकी १०० टक्के मिळण्यासाठी जेवढे गुण कमी आहेत, तेवढे गुण स्पोर्टस् कोट्यातून मिळाले आहेत. ४३० विद्यार्थ्यांना स्पोर्टस् सवलतीतून गुण... लातूर विभागातील लातूर जिल्ह्यातून ४३० विद्यार्थ्यांनी स्पोर्टस् सवलतीचा फायदा उचलला आहे. ३९९ विद्यार्थी शालेय स्पर्धेत सहभाग घेऊन स्पोर्टस् गुणांसाठी पात्र झाले आहेत. तर ३१ विद्यार्थी संघटनेमार्फत आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदवून हे गुण मिळविले आहेत. त्यांच्या बेस्ट फाईव्हची आणि स्पोर्टस्ची बेरीज एकत्र झाल्याने यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे १०० पैकी १०० गुण आले आहेत.