शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

लोकपालमुळे ८५ टक्के भ्रष्टाचार थांबेल- अण्णा हजारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 00:08 IST

माहिती अधिकार कायद्यापेक्षा लोकपाल-लोकायुक्त कायदा क्रांतिकारी व सशक्त आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास देशातील ८५ टक्के भ्रष्टाचाराला ब्रेक लागून त्याचे चांगले परिणाम वर्षभरात दिसून येतील, असा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

- एकनाथ भालेकरराळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : माहिती अधिकार कायद्यापेक्षा लोकपाल-लोकायुक्त कायदा क्रांतिकारी व सशक्त आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास देशातील ८५ टक्के भ्रष्टाचाराला ब्रेक लागून त्याचे चांगले परिणाम वर्षभरात दिसून येतील, असा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.अण्णा म्हणाले, १९६६ पासून लोकसभेत अनेकदा लोकपाल विधेयक मांडण्यात आले. मोरारजी देसाई, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी व अन्य पंतप्रधानांच्या कार्यकाळात त्याचे कायद्यात रूपांतर झाले नाही. परंतु, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेच्या रेट्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सरकारला लोकपाल-लोकायुक्त कायदा करावा लागला. माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आले. लोकपाल कायदा माहिती अधिकार कायद्यापेक्षाही सशक्त आहे. लोकपाल ही व्यक्ती नसून, भ्रष्टाचार निपटून काढणारी शक्ती आहे. लोकपाल स्वायत्त संस्था आहे. कोणत्याही नागरिकास पंतप्रधान, मंत्री, खासदार व सरकारी सेवेतील वर्ग ते १ ते ४ अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार आढळला, त्याने पुरावे सादर केले, तर संबंधितांच्या चौकशीचे अधिकार लोकपाल समितीला आहेत. सर्व अधिकार जनतेला मिळणार असल्यानेच सरकार घाबरते. लोकायुक्त कायदाही प्रत्येक राज्यासाठी महत्त्वाचा आहे.निवडणुकीत आश्वासन देऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी चार वर्षांचा कालावधी घालविल्याने प्रत्यक्षात कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी सरकारवर आंदोलनाचा दबाव आणणे आवश्यक आहे. लोकपाल व लोकायुक्त कायद्याच्या जागृतीसाठी लोकशिक्षण व लोकजागृती अभियान राबविणार आहे.निवड समितीची स्थापना कधी?लोकपाल निवड समितीत पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नेमणार असल्याचे पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे अण्णांनी सांगितले. विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याचे कारण देऊन लोकपाल निवड समितीची स्थापना करण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अनेकदा फटकारले होते. या निवड समितीची स्थापना झाल्यास लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होऊ शकेल, असा विश्वासही हजारे यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे