शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

लोकपालमुळे ८५ टक्के भ्रष्टाचार थांबेल- अण्णा हजारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 00:08 IST

माहिती अधिकार कायद्यापेक्षा लोकपाल-लोकायुक्त कायदा क्रांतिकारी व सशक्त आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास देशातील ८५ टक्के भ्रष्टाचाराला ब्रेक लागून त्याचे चांगले परिणाम वर्षभरात दिसून येतील, असा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

- एकनाथ भालेकरराळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : माहिती अधिकार कायद्यापेक्षा लोकपाल-लोकायुक्त कायदा क्रांतिकारी व सशक्त आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास देशातील ८५ टक्के भ्रष्टाचाराला ब्रेक लागून त्याचे चांगले परिणाम वर्षभरात दिसून येतील, असा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.अण्णा म्हणाले, १९६६ पासून लोकसभेत अनेकदा लोकपाल विधेयक मांडण्यात आले. मोरारजी देसाई, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी व अन्य पंतप्रधानांच्या कार्यकाळात त्याचे कायद्यात रूपांतर झाले नाही. परंतु, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेच्या रेट्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सरकारला लोकपाल-लोकायुक्त कायदा करावा लागला. माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आले. लोकपाल कायदा माहिती अधिकार कायद्यापेक्षाही सशक्त आहे. लोकपाल ही व्यक्ती नसून, भ्रष्टाचार निपटून काढणारी शक्ती आहे. लोकपाल स्वायत्त संस्था आहे. कोणत्याही नागरिकास पंतप्रधान, मंत्री, खासदार व सरकारी सेवेतील वर्ग ते १ ते ४ अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार आढळला, त्याने पुरावे सादर केले, तर संबंधितांच्या चौकशीचे अधिकार लोकपाल समितीला आहेत. सर्व अधिकार जनतेला मिळणार असल्यानेच सरकार घाबरते. लोकायुक्त कायदाही प्रत्येक राज्यासाठी महत्त्वाचा आहे.निवडणुकीत आश्वासन देऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी चार वर्षांचा कालावधी घालविल्याने प्रत्यक्षात कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी सरकारवर आंदोलनाचा दबाव आणणे आवश्यक आहे. लोकपाल व लोकायुक्त कायद्याच्या जागृतीसाठी लोकशिक्षण व लोकजागृती अभियान राबविणार आहे.निवड समितीची स्थापना कधी?लोकपाल निवड समितीत पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नेमणार असल्याचे पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे अण्णांनी सांगितले. विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याचे कारण देऊन लोकपाल निवड समितीची स्थापना करण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अनेकदा फटकारले होते. या निवड समितीची स्थापना झाल्यास लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होऊ शकेल, असा विश्वासही हजारे यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे