शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

८४ वर्षांची ‘तरुण’ आजी कसते शेती; कमावते लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 09:51 IST

Agriculture: मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील ८४ वर्षांची ‘तरुण’ आजी अजूनही शेतात राबून शेती करीत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या आजीला शासनाने प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरविले आहे.

- संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यातील गोरेगाव येथील ८४ वर्षांची ‘तरुण’ आजी अजूनही शेतात राबून शेती करीत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या आजीला शासनाने प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरविले आहे. या आजी शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन स्वतः करून लाखोंचे उत्पन्न घेतात.तालुक्यातील गोरेगाव येथील गावालगत असलेल्या शेतात बांधलेल्या घरात मुले व नातवासह मनकर्णाबाई रामराव डोईफोडे या आजी राहतात.

मनकर्णाबाई यांचे पती रामराव यांचे १९७२ ला आजारामुळे निधन झाले. त्यानंतर त्यांच्याकडे पाच एकर शेती हिश्श्याला आली. मुले लहान होती, पण बिकट परिस्थितीतही त्यांनी मुलांना सोबत घेऊन कष्ट उपसले. ५ एकरांची शेती आता ३० एकरवर गेली आहे. त्या स्वतः या शेतीत आजही राबतात. आजी सुरुवातीला केळी, पपई, असे फळपिके घ्यायच्या. सद्य:स्थितीत खरीप हंगामाला कपाशी, सोयाबीन, तूर, रब्बी हंगामाला हरभरा, गहू, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला पिकवितात. आश्चर्य म्हणजे ज्या जमिनीमध्ये केळी उत्पादन घेऊ शकत नाही, अशा जमिनीत आजींनी केळीचे विक्रमी उत्पादन घेतले. यासाठी २००२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांना नऊ हजार रुपयांचे प्रोत्साहन पारितोषिक देऊन सन्मानित केले. आजीची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांची नजर व श्रवणशक्ती तीक्ष्ण आहे. त्यांच्या डोळ्याला चष्मा नाही किंवा त्या कुठल्याही आजाराने ग्रस्त नाहीत. 

मेहनतीने कमाविले तर...मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही, मेहनतीने जर कमाविले तर त्याला डागसुद्धा लागत नाही, असे त्या अभिमानाने सांगतात. आजींचे जीवन अत्यंत संघर्षमय गेले. आयुष्यात भरपूर संकटे आली. आजींनी त्यावर मात केली. एवढेच नव्हे तर शेती करणाऱ्या आजी तरुण शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

पतीच्या निधनानंतर शेतीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. त्यानंतर शेतीत स्वतःला झोकून दिले. तेव्हा ५ एकर शेती होती, आता ३० एकर आहे. मजुरांकडून काम करून घेत असताना स्वतःही त्यांच्याबरोबर काम करते. एकरी १५ क्विंटल उत्पन्न आजही घेते.- मनकर्णाबाई डोईफोडे, शेतकरी, गोरेगाव

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAkolaअकोला