शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

५६१ ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 05:11 IST

राज्यातील विविध ३१ जिल्ह्यांतील ५६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १७४ ग्रामपंचायतीमधील २३७ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ८२ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी रविवारी दिली.

मुंबई  - राज्यातील विविध ३१ जिल्ह्यांतील ५६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १७४ ग्रामपंचायतीमधील २३७ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ८२ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी रविवारी दिली.या निवडणुकांसाठी स. ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत मात्र केवळ दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. पालघर, भंडारा व गोंदिया हे तीन जिल्हे वगळता, इतर सर्व जिल्ह्यांतील मतमोजणी सोमवारी, २८ तारखेला होईल. पालघर, भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यांत लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत आज झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी ४ जून रोजी होईल.जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्याठाणे ४(८), पालघर २(९), रायगड १५९(५), रत्नागिरी(१), सिंधुदुर्ग २, नाशिक २०(७), धुळे ७, जळगाव ७(५), अहमदनगर ७०(१२), नंदुरबार (२), पुणे ८० (१५), सोलापूर ३(२२), सातारा १५(४), सांगली ७१(५), कोल्हापूर ६२(११), औरंगाबाद ४(६), बीड २(१), नांदेड ३(६), उस्मानाबाद १(७), परभणी १(१), जालना (३), लातूर ४(३), हिंगोली (१), अमरावती (६), अकोला १(४), यवतमाळ २५(६), वाशीम (२), बुलडाणा (३), वर्धा १४(५), चंद्रपूर (२), भंडारा ४(१), गोंदिया (५) आणि गडचिरोली (६) एकूण ५६१(१७४). (कंसात पोटनिवडणुकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक