शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चिंताजनक! राज्यात ६ महिन्यांत ८२ बिबट्यांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 20:25 IST

१ जानेवारी ते १ जुलै कालावधीतील वन्यजीव सोसायटीचा अहवाल

अमरावती : मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने वन्यप्राण्यांना जंगलाबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे शिकार, विजेचा धक्का आणि रेल्वे, रस्ते अपघातात गेल्या सहा महिन्यांत राज्यात ८२ बिबट्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल वन्यजीव सोसायटीने वन विभागाकडे सादर केला आहे. अमरावती व नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांना जीव गमवावा लागल्याची आकडेवारी आहे.शिकार, वणवा, रेल्वे अपघात व विहिरीत पडून जीव गमावलेल्या बिबट्यांचा आकडेवारीत समावेश आहे. वाघांच्या शिकारीनंतर बिबट्यांना लक्ष केले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बिबट्याची कातडी, नखे, दात, अवयवांची तस्करी केली जाते. सन २०१८ मध्ये वनविभागाकडे सादर केलेल्या अहवालात बिबट्यांचा शिकारीसाठी खात्मा केल्याची बाब समोर आली आहे. काही ठिकाणी विषबाधा, मानव आणि वन्यजीव संघर्षातून बिबट्यांना जीव गमवावा लागला. अमरावती जिल्ह्यात गतवर्षी रस्ते अपघातात पाच बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे करण्यात आली आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष ही खेदजनक बाब असून, वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धनासाठी वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. 

कटनी अवयव तस्करीचे केंद्र काही वर्षांपूर्वी वाघांच्या अवयव तस्करीचे केंद्र असलेले मध्यप्रदेशातील कटनी हे आता बिबट्याच्या अवयव तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. बिबट्याची शिकार केल्यानंतर त्याची कातडी, दात, नखे आणि अवयवांची विल्हेवाट कटनी येथून लावण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वनविभागाने वाघ संरक्षणाकडे लक्ष देतात शिकाऱ्यांनी आता बिबट्याच्या शिकारीकडे मोर्चा वळविला आहे. 

विधिमंडळात तारांकित प्रश्नबिबट्यांचे बळी जात असल्याप्रकरणी आमदार राजू तोडसाम यांनी राज्य विधिमंडळात तारांकित प्रश्न सादर केला आहे. बिबट्यांच्या मृत्यूची कारणे, मानव अणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने केलेल्या उपाययोजना, शिकारी आदी विषयांवर त्यांनी बोट ठेवले आहे. या तारांकित प्रश्नांच्या अनुषंगाने वनविभागाने बिबट्यांच्या मृत्यूची आकडेवारी विधिमंडळात माहिती पाठविली आहे. 

टॅग्स :leopardबिबट्या