शहरं
Join us  
Trending Stories
1
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
2
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
3
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
4
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
5
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
6
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
7
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
8
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
9
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
10
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
11
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
12
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
13
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
14
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
15
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
16
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
17
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
19
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
20
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! राज्यात ६ महिन्यांत ८२ बिबट्यांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 20:25 IST

१ जानेवारी ते १ जुलै कालावधीतील वन्यजीव सोसायटीचा अहवाल

अमरावती : मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने वन्यप्राण्यांना जंगलाबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे शिकार, विजेचा धक्का आणि रेल्वे, रस्ते अपघातात गेल्या सहा महिन्यांत राज्यात ८२ बिबट्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल वन्यजीव सोसायटीने वन विभागाकडे सादर केला आहे. अमरावती व नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांना जीव गमवावा लागल्याची आकडेवारी आहे.शिकार, वणवा, रेल्वे अपघात व विहिरीत पडून जीव गमावलेल्या बिबट्यांचा आकडेवारीत समावेश आहे. वाघांच्या शिकारीनंतर बिबट्यांना लक्ष केले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बिबट्याची कातडी, नखे, दात, अवयवांची तस्करी केली जाते. सन २०१८ मध्ये वनविभागाकडे सादर केलेल्या अहवालात बिबट्यांचा शिकारीसाठी खात्मा केल्याची बाब समोर आली आहे. काही ठिकाणी विषबाधा, मानव आणि वन्यजीव संघर्षातून बिबट्यांना जीव गमवावा लागला. अमरावती जिल्ह्यात गतवर्षी रस्ते अपघातात पाच बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे करण्यात आली आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष ही खेदजनक बाब असून, वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धनासाठी वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. 

कटनी अवयव तस्करीचे केंद्र काही वर्षांपूर्वी वाघांच्या अवयव तस्करीचे केंद्र असलेले मध्यप्रदेशातील कटनी हे आता बिबट्याच्या अवयव तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. बिबट्याची शिकार केल्यानंतर त्याची कातडी, दात, नखे आणि अवयवांची विल्हेवाट कटनी येथून लावण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वनविभागाने वाघ संरक्षणाकडे लक्ष देतात शिकाऱ्यांनी आता बिबट्याच्या शिकारीकडे मोर्चा वळविला आहे. 

विधिमंडळात तारांकित प्रश्नबिबट्यांचे बळी जात असल्याप्रकरणी आमदार राजू तोडसाम यांनी राज्य विधिमंडळात तारांकित प्रश्न सादर केला आहे. बिबट्यांच्या मृत्यूची कारणे, मानव अणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने केलेल्या उपाययोजना, शिकारी आदी विषयांवर त्यांनी बोट ठेवले आहे. या तारांकित प्रश्नांच्या अनुषंगाने वनविभागाने बिबट्यांच्या मृत्यूची आकडेवारी विधिमंडळात माहिती पाठविली आहे. 

टॅग्स :leopardबिबट्या