शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन क्षेत्रात ८.१२ लाख हेक्टरची वाढ!

By admin | Updated: March 18, 2015 02:13 IST

लाभक्षेत्रातील सिंचित क्षेत्रात एका वर्षात ८.१२ लाख हेक्टरनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. शिवाय जलसाठ्याची क्षमता वाढल्याची आकडेवारीही आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाली आहे.

अतुल कुलकर्णी -मुंबईजलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील लाभक्षेत्रातील सिंचित क्षेत्रात एका वर्षात ८.१२ लाख हेक्टरनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. शिवाय जलसाठ्याची क्षमता वाढल्याची आकडेवारीही आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाली आहे. २०११-१२मध्ये अशाच अहवालात सिंचन क्षेत्रात ०.१ टक्का वाढ झाल्यावरून गहजब झाला होता. हा अहवाल म्हणजे भाजपा सरकारने राष्ट्रवादी सरकारच्या जलसंपदा विभागाला दिलेले प्रशस्तिपत्र आहे, अशी प्रतिक्रिया माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी दिली आहे. आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला, त्यामुळे सिंचन क्षेत्रात केवळ ०.१ टक्का वाढ झाली, असा आरोप भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी २०११-१२च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘श्वेतपत्रिका’ काढण्याची घोषणा केली. जलसंपदातील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण थेट न्यायालयात गेले. सरकारने माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमली. चितळे समितीने दिलेल्या अहवालात इतर तांत्रिक बाबींवर बोट ठेवतानाच सिंचन क्षेत्र वाढल्याचे म्हटले होते.सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने विदर्भ आणि कोकणातील सिंचन प्रकल्पांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशाची शाई वाळत नाही, तोच आलेल्या २०१४-१५च्या आर्थिक पाहाणी अहवालात राज्यातील सिंचन क्षेत्रात ८.१२ लाख हेक्टरनी वाढ झाल्याचे म्हटले आहे. या वाढीव सिंचनाचे श्रेय कोणाला, यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात.असे असले तरी खरी गोम वेगळीच आहे. जलसंपदातील एक ज्येष्ठ अधिकारी म्हणाले, टक्केवारीमध्ये सिंचन क्षमता मोजण्याची कोणतीही निश्चित अशी पद्धती आजही उपलब्ध नाही. त्यामुळे टक्केवारीत सिंचन क्षमता न मोजता हेक्टरमध्ये मोजली जाते. कारण, लाभ क्षेत्राच्या आतले आणि बाहेरचे क्षेत्र कसे व किती मोजायचे, त्यातून सिंचनाची टक्केवारी किती व कशी ठरवायची, याचे काहीही सूत्र नाही. त्यामुळे त्यावर एक समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल अजून आलेला नाही.चव्हाणांनी अहवाल वाचावाविधिमंडळात मांडला गेलेला अहवाल आता तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काळजीपूर्वक वाचावा. शंका असतील तर नव्या जलसंपदा मंत्र्यांना विचाराव्यात, अशी टीका माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी केली. ते म्हणाले, आम्ही हेच सांगत होतो; पण चव्हाण यांनी राजकीय स्वार्थासाठी स्वत:च्या पक्षाला आणि सहयोगी राष्ट्रवादीलाही अडचणीत आणले.