शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

फडणवीस सरकारच्या कामगिरीला 81% जनतेची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 06:56 IST

विविध सामाजिक कल्याण आणि रोजगार उपक्रमाच्या अंमलबजावणीवर सुमारे ८१ टक्के जनता ही समाधानी असल्याचे हंसा रिसर्च व न्यूज 18- लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारने चार वर्षात शहरी व निमशहरी भागात राबविलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, परडवणारी घरे, शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, कौशल्य विकासअंतर्गत रोजगार क्षमता निर्माण करणे आदी विविध सामाजिक कल्याण आणि रोजगार उपक्रमाच्या अंमलबजावणीवर सुमारे ८१ टक्के जनता ही समाधानी असल्याचे हंसा रिसर्च व न्यूज 18- लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.शहरी व ग्रामीण भागातील सर्वात जास्त लोकांनी पायाभूतसुविधांबद्दल सर्वात जास्त समाधान व्यक्त केल्याचे दिसते. ग्रामीण, शहरी व निम भागातील जनतेला मेट्रो, विमानतळ, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, परवडणारी घरे, मुंबई गोवा महामार्गाचे काम, मुंबई, लहान शहरांमधील हवाई वाहतूक सुविधा, वांद्रे ते विरार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉर, न्हावा शेवा सागरी मार्ग, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, मिहान, नवी मुंबई विमानतळाची मंजुरी, वीज उत्पादन वाढविणे व वीज भारनियमन कमी करणे, घर खरेदीदारांसाठी महारेरा आदी पायाभूत सुविधांसाठी केलेल्या विविध योजनांबद्दल या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आले होते.शेतकरी ते ग्राहक बाजार, शेतमाल विक्रीतील मध्यस्थ काढणे, किमत ठरविण्याची शेतकऱ्यांना मुभा या बाबत ८१ टक्के ग्रामीण जनतेने समाधान व्यक्त केले. त्यातील ६२ टक्के अत्यंत समाधानी होते. पीक विम्याबद्दल ७८ शेतकरी समाधानी होते. शहरी व निम शहरी भागातील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्गाच्या कल्याणासाठी राबविलेल्या योजनांबद्दल ७८ ते ७९ टक्के जनतेचा कौल युती शासनाकडे आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरकारला पसंती देण्याचा टक्का वाढला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा