शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

८०० जागा वाढल्या; अध्यापक कुठे आहेत? ‘एमबीबीएस’साठी अध्यापकांचा शाेध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 10:16 IST

उसनवारी तत्त्वावर घेतलेले अध्यापक कोर्टात जाण्याच्या भीतीने त्या ठिकाणी विभागाने ‘आस्ते कदम’ची भूमिका घेतली आहे. 

- संतोष आंधळे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ८०० जागा वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, नवीन परवानगी मिळलेल्या आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकविण्यासाठी अध्यापक कुठून आणायचे हा प्रश्न वैद्यकीय शिक्षण विभागाला पडला आहे. 

यासाठी काही अध्यापकांच्या सेवा वर्ग करणे, तसेच काही अध्यापकांच्या नियमानुसार होत असणाऱ्या बदल्या आणि कंत्राटी पद्धतीने अध्यापक भरती या तिन्ही गोष्टींवर विभाग सध्या काम करत आहे. उसनवारी तत्त्वावर घेतलेले अध्यापक कोर्टात जाण्याच्या भीतीने त्या ठिकाणी विभागाने ‘आस्ते कदम’ची भूमिका घेतली आहे. 

सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाची राज्यात २५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शैक्षिणक विभागाने सोमवारी गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती,  भंडारा, अंबरनाथ येथेही महाविद्यालय सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला या महाविद्यालयांना परवानगी पत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत. 

नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील इतर महाविद्यालयांतील प्राध्यापकांना दिला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार, एमबीबीएस अभ्याक्रमाच्या प्रथम वर्षाला शरीररचना शास्त्र, शरीरविज्ञान शास्त्र आणि जीवररसायन शास्त्र हे तीन विषय शिकविले जातात. त्याचप्रामणे जनऔषधवैदक शास्त्र विषयाचे लेक्चर घेतले जातात. त्याचप्रमाणे प्रयोगशाळेत शरीर विच्छेदन शिकविले जाते. यासाठी या विषयातील अध्यापकांची पहिल्या वर्षासाठी गरज असते. वैद्यकीय शिक्षण विभागाने ही गरज ओळखून या विषयातील तज्ज्ञ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नेमणार आहेत.

नवीन महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधा पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी इमारती भाड्याने घेतल्या आहेत. अध्यापक वर्गासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यासाठी ज्या काही अध्यापकांच्या बदल्या झाल्या आहेत, काहींची सेवा वर्ग करण्यात आली आहे, तर काही प्रमाणात कंत्राटी स्वरूपात अध्यापक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवतेत तडजोड केली जाणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेत आहोत.     - दिनेश वाघमारे, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग

टॅग्स :doctorडॉक्टर