शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

वृक्षारोपणाचे ८० टक्के लक्ष्य पूर्ण, अल्पसंख्याक विभागाची आकडेवारी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:56 IST

शासनाने आखलेल्या वृक्ष लागवड उपक्रमात या वर्षी १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत ३८ लाखांहून अधिक लोकांनी १५ कोटी ८८ लाख वृक्षारोपण केले. शैक्षणिक संस्थांना दिलेल्या लक्ष्यापैकी ८० टक्के लक्ष्य पूर्ण केले

मुंबई : शासनाने आखलेल्या वृक्ष लागवड उपक्रमात या वर्षी १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत ३८ लाखांहून अधिक लोकांनी १५ कोटी ८८ लाख वृक्षारोपण केले. शैक्षणिक संस्थांना दिलेल्या लक्ष्यापैकी ८० टक्के लक्ष्य पूर्ण केले असून त्यासाठी ६ लाख २९ हजार ३५१ लोकांनी सहभाग दर्शविल्याची माहिती मिळाली आहे.राज्यात शैक्षणिक संस्थांना सांगितलेल्या १९ लाख ६० हजार ४९० झाडांपैकी १४ लाख ३६ हजार ८३९ रोपे लावण्यात यश मिळाले आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांचा आढावा घेतला असता मुंबई आणि उपनगरांची कामगिरी अत्यंत कमी आहे. मुंबई उपनगरात ९९ टक्के वृक्षारोपण होऊनही शैक्षणिक संस्थांचा त्यातील सहभाग शून्य टक्के असल्याचे दिसले. मुंबईखालोखाल बीड आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचा सहभाग कमी आहे. तर नागपूर, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, वर्धा, वाशीम जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचा सहभाग १०० टक्के आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही ६३.२७ % लक्ष्य पूर्ण करण्यात यश मिळविले आहे. औरंगाबाद, बीड, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, वाशीम या जिल्ह्यांनी आपले लक्ष्य १०० टक्के पूर्ण केले. तर ठाणे, रायगड, पुणे, परभणी, पालघर, नांदेड, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, जालना, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांतील उच्च व तंत्र शिक्षण संस्थांनी वृक्षारोपण लागवडीत शून्य सहभाग दर्शविला आहे.अल्पसंख्याक विभागाची आकडेवारी शून्य१३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमात शैक्षणिक संस्थांचा सहभाग ८० टक्के आहे. या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या दुसऱ्या विभागाचा संकेतस्थळावर सहभाग माहितीवरून शून्य असल्याचे दिसते. अल्पसंख्याक विभागाला वृक्षारोपणासाठी लक्ष्य ठरवून दिले होते. मात्र संकेतस्थळावरील माहितीनुसार या विभागाच्या वृक्षारोपणाची कोणत्याच जिल्हा, तालुक्याची माहिती उपलब्ध नाही. याबाबत वन व महसूल विभागाच्या मंत्रालयातील अधिकाºयांनी, विभागातून वृक्षारोपण झाले असले तरी त्याची माहिती तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळावर उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र