शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

वृक्षारोपणाचे ८० टक्के लक्ष्य पूर्ण, अल्पसंख्याक विभागाची आकडेवारी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:56 IST

शासनाने आखलेल्या वृक्ष लागवड उपक्रमात या वर्षी १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत ३८ लाखांहून अधिक लोकांनी १५ कोटी ८८ लाख वृक्षारोपण केले. शैक्षणिक संस्थांना दिलेल्या लक्ष्यापैकी ८० टक्के लक्ष्य पूर्ण केले

मुंबई : शासनाने आखलेल्या वृक्ष लागवड उपक्रमात या वर्षी १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत ३८ लाखांहून अधिक लोकांनी १५ कोटी ८८ लाख वृक्षारोपण केले. शैक्षणिक संस्थांना दिलेल्या लक्ष्यापैकी ८० टक्के लक्ष्य पूर्ण केले असून त्यासाठी ६ लाख २९ हजार ३५१ लोकांनी सहभाग दर्शविल्याची माहिती मिळाली आहे.राज्यात शैक्षणिक संस्थांना सांगितलेल्या १९ लाख ६० हजार ४९० झाडांपैकी १४ लाख ३६ हजार ८३९ रोपे लावण्यात यश मिळाले आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांचा आढावा घेतला असता मुंबई आणि उपनगरांची कामगिरी अत्यंत कमी आहे. मुंबई उपनगरात ९९ टक्के वृक्षारोपण होऊनही शैक्षणिक संस्थांचा त्यातील सहभाग शून्य टक्के असल्याचे दिसले. मुंबईखालोखाल बीड आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचा सहभाग कमी आहे. तर नागपूर, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, वर्धा, वाशीम जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचा सहभाग १०० टक्के आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही ६३.२७ % लक्ष्य पूर्ण करण्यात यश मिळविले आहे. औरंगाबाद, बीड, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, वाशीम या जिल्ह्यांनी आपले लक्ष्य १०० टक्के पूर्ण केले. तर ठाणे, रायगड, पुणे, परभणी, पालघर, नांदेड, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, जालना, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांतील उच्च व तंत्र शिक्षण संस्थांनी वृक्षारोपण लागवडीत शून्य सहभाग दर्शविला आहे.अल्पसंख्याक विभागाची आकडेवारी शून्य१३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमात शैक्षणिक संस्थांचा सहभाग ८० टक्के आहे. या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या दुसऱ्या विभागाचा संकेतस्थळावर सहभाग माहितीवरून शून्य असल्याचे दिसते. अल्पसंख्याक विभागाला वृक्षारोपणासाठी लक्ष्य ठरवून दिले होते. मात्र संकेतस्थळावरील माहितीनुसार या विभागाच्या वृक्षारोपणाची कोणत्याच जिल्हा, तालुक्याची माहिती उपलब्ध नाही. याबाबत वन व महसूल विभागाच्या मंत्रालयातील अधिकाºयांनी, विभागातून वृक्षारोपण झाले असले तरी त्याची माहिती तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळावर उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र