शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

राज्यात उष्माघाताचे ८, पाणीटंचाईचे ३ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 06:35 IST

राज्यात उष्णतेचा कहर कायम असून, उष्माघाताने मराठवाड्यात ५ तर अकोल्यात २ व नगर जिल्ह्यात एक बळी गेला. पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तिघांचा लातूर जिल्ह्यात गुदमरून मृत्यू झाला

औरंगाबाद/अकोला/लातूर : राज्यात उष्णतेचा कहर कायम असून, उष्माघाताने मराठवाड्यात ५ तर अकोल्यात २ व नगर जिल्ह्यात एक बळी गेला. पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तिघांचा लातूर जिल्ह्यात गुदमरून मृत्यू झाला. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीड जिल्ह्यात राजापूर येथील सुमंताबाई देवीदास बेडके(४५) यांना उन्हामुळे रविवारी ताप येऊन उलट्या झाल्या. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बीडसांगवी येथे दत्तात्रय चव्हाण (१७) यांचा उष्माघाताने शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील गोजेगाव येथे उष्माघाताने संतोष नागरे (३५) याचा रविवारी मृत्यू झाला. वसमत तालुक्यातील लक्ष्मण कांबळे (४५) हे चक्कर येऊन पडले. उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ येथे उष्माघाताने व्यंकट म्हेकरे (४ महिने) या बाळाचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात देसवडे येथील संगीता फटांगरे (२८) या विवाहितेचा सोमवारी उष्माघाताने मृत्यू झाला. अकोल्यात उष्माघातामुळे एक अनोळखी वृद्ध व वाडेगाव येथे संजय महादेव लोखंडे यांचा मृत्यू झाल्याचे समजते. 

तिघांचा गुदमरून मृत्यूलातूर जिल्ह्यात आलमला येथे विहिरीत उतरलेल्या सद्दाम फारुख मुलानी (२२), त्याचे वडील फारुख खुदबुदीन मुलानी (४६) व त्यांचा पुतण्या सईद दाऊद मुलानी (२६) यांचा जीव गुदमरला. त्यांना बाहेर काढण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात