शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

26 पाटबंधारे प्रकल्पांच्या पूर्तीसाठी केंद्राकडून 756 कोटींचे कर्ज वितरण

By admin | Updated: December 26, 2016 18:36 IST

अल्प व्याजदराने रु. 756 कोटीचे नाबार्ड कर्जाचे वितरण महाराष्ट्र राज्यास करण्यात आले.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 26 - प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (AIBP) अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 26 मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्रीय अर्थसहाय्य व दीर्घ मुदतीचे अल्प व्याजदराने रु. 756 कोटीचे नाबार्ड कर्जाचे वितरण महाराष्ट्र राज्यास करण्यात आले. वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमाचा समावेश आता प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत करण्यात आला असून, आज 26 डिसेंबर, 2016 रोजी इंडियन हॅबिटॅट सेंटर नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमास केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली, केंद्रीय शहरी विकास, सूचना आणि प्रसारण मंत्री सुश्री एम. वैंकय्या नायडू, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीषजी महाजन, केंद्रीय जल संसाधन विभागाचे सचिव शशी शेखर आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यास रु.756 कोटीचे नाबार्ड कर्ज वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमात गुजरात राज्यास रु. 463 कोटीचे नाबार्ड कर्ज वितरीत करण्यात आले.देशातील या 99 प्रकल्पात महाराष्ट्रातील 26 अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्र शासनाने यापूर्वीच ऑक्टोबर 2016 मध्ये रु. 339.40 कोटीचे अर्थसहाय्याचा पहिला हप्ता उपलब्ध करून दिला होता. या योजनेत वाघुर, बावनथडी, निम्न दुधना, तिलारी, निम्न वर्धा, निम्न पांझरा, नांदुर मधमेश्वर टप्पा-2, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा, बेंबळा, तारळी, धोमबलकवडी, अर्जुना ऊर्ध्व कुंडलीका, अरुणा, कृष्णा-वारणा उसिंयो, गडनदी, डोंगरगाव, सांगोला शाखा कालवा, खडकपूर्णा वारणा, मोरणा(गुरेघर), निम्न पेढी, वांग, नरडवे(महमद वाडी), कुडाळी इ. प्रकल्पांचा समावेश आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट झालेले सर्व कामे आता गतीने सुरू आहेत. बावनथडी, निम्न पांझरा हे प्रकल्प पूर्णत्वाचे टप्प्यावर आहेत. नांदुर मधमेश्वर प्रकल्पाअंर्तगत भाम व वाकी धरणाची कामे गतीने सुरू आहेत. धोम बलकवडी प्रकल्पाचे पाणी फलटण तालुक्यात पोहोचले आहे. निम्न पांझरा प्रकल्पातूनही या वर्षी पहिल्यांदाच सिंचनसाठी पाणी उपलब्ध झाले.केंद्र शासनाच्या या निर्णयानुसार राज्यातील वेगवर्धित सिंचन लाभ योजनेंतर्गत अपूर्ण 26 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सन 2016-17 ते सन 2019-20 या कालावधीत एकूण रु. 3830 कोटी इतके केंद्रीय अर्थसहाय्य मिळणे अपेक्षित आहे. तसेच राज्य शासनास सदर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम निश्चितपणे उपलब्ध करून देता यावी, यासाठी नाबार्डच्या माध्यमातून दीर्घकालीन ( 15 वर्षं मुदतीचे ) व सवलतीच्या दरात सुमारे 6% व्याज दराने कर्जाची सुविधा निर्माण करून दिली आहे. या योजनेतून वेगवर्धित सिंचन लाभ योजनेतील 26 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एप्रिल 2016 ते डिसेंबर 2019 या कालावधीत रु.12773 कोटी इतके कर्जसहाय्य उपलब्ध होणारे आहे. सदर 26 प्रकल्प पूर्ण झाल्यावर 5.56 लक्ष हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.