शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

७०० चौ.फुट घरांना मालमत्ता कर माफी?, उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांची कुरघोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 06:34 IST

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या इच्छेनुसार मुंबईतील ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करमाफीचा ठराव मुंबई महापालिकेने मंजूर केलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे सांगत ठाकरे यांच्यावर एकप्रकारे कुरघोडीच केली.

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या इच्छेनुसार मुंबईतील ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करमाफीचा ठराव मुंबई महापालिकेने मंजूर केलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे सांगत ठाकरे यांच्यावर एकप्रकारे कुरघोडीच केली.मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने ७०० चौ. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी दिली जाऊ शकते. पालिका आयुक्तांनी यासंदर्भातील वैधानिक कार्यवाही पूर्ण करून तो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई शहराचा विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावलीस अंतिम मंजुरी राज्य सरकार चालू महिन्यातच देईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुंबई शहर व उपनगराचा विकास आराखडा शासन मान्यतेसाठी प्रलंबित असल्याबद्दल सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.मुंबईतील मूळ निवासी असलेले कोळी, आदिवासी बांधव यांच्या गावठाणांचे आणि पाड्यांचे सीमांकन केले जात आहे. त्यात जर काही गावठाण, पाडे सुटले तर मुंबई पालिका आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. मार्चमध्ये विकास आराखडा होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.>अनधिकृत इमारती पाडणारमुंबईत अनेक इमारती अनधिकृतपणे उभ्या असून अजूनही बांधकाम सुरूच आहे, याकडे राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. अशा इमारतींची एक यादीच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. या प्रकरणी येत्या तीन महिन्यात शोध मोहीम राबवून अशा इमारती जमीनदोस्त केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.शिवसेनेचे पक्षप्रुमखउद्धव ठाकरे यांनी500चौरस फुटापर्यंतच्याघरांना मालमत्ता कर माफ करण्याची भूमिका घेतली होती असे शिवसेनेचेसुनील प्रभू म्हणाले. त्यावर, भाजपाचे आशीष शेलार यांनी ७०० फुटाबाबतची मागणी केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.>पुनर्विकासासाठी५१ टक्क्यांची सहमतीइमारतींच्या पुनर्विकासासाठीसध्या ७० टक्के रहिवाशांची सहमती लागते पण ती यापुढे५१ टक्के इतकी केली जाईल. तशी तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत केली जाईल. गावठाण, कोळीवाडे, पाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे