शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

यवतमाळ: सपना पळसकर नरबळी प्रकरणी सात आरोपींना फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 21:13 IST

या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने सात आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच अन्य एका महिला आरोपीला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.आरोपी देविदास हा सपनाचा मामा, तर पुनाजी हा तिचा आजोबा आहे. अन्य आरोपीही सपनाचे दूरचे नातेवाईकच होते.

यवतमाळ, दि. 14 - यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या घाटंजी येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणी यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने सात आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच अन्य एका महिला आरोपीला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील चोरंबा गावात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या सपना पळसकर या बालिकेच्या नरबळीप्रकरणाने यवतमाळ जिल्हा हादरला होता.  

यवतमाळचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.मनोज लाल्या आत्राम (19), देविदास पुनाजी आत्राम (22), यादवराव तुकाराम टेकाम (50), पुनाजी महादेव आत्राम (54), रामचंद्र गणपत आत्राम (70), मोतीराम महादेव मेश्राम (५४), यशोदा पांडुरंग मेश्राम (60, सर्व रा. चोरंबा ता. घाटंजी जि. यवतमाळ) अशी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच दुर्गा शिरभाते हिला नरबळीच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत पाच वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

यातील आरोपी देविदास हा सपनाचा मामा, तर पुनाजी हा तिचा आजोबा आहे. अन्य आरोपीही सपनाचे दूरचे नातेवाईकच होते. सपना गोपाल पळसकर (7) रा. चोरंबा या बालिकेचा 24 आॅक्टोबर 2012 रोजी दस-याच्या दिवशी सायंकाळी 7.30 वाजता घरासमोरुन अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला होता. मृत सपनाची आई शारदा गोपाल पळसकर हिच्या फिर्यादीवरून घाटंजी पोलिसांनी प्रथम खुनाचा (३०२) व नंतर तपासादरम्यान भादंवि 363, 364, 201, 120 (ब), 34 कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदनसिंग बायस यांनी या गाजलेल्या नरबळी प्रकरणाचा काटेकोर तपास करून 20 आॅगस्ट 2013 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.या खटल्यात 13 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता शुभांगी वीरेंद्र दरणे, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. गणेश धात्रक यांनी काम पाहिले. हे प्रकरण अंगावर शहारे आणणारे आहे. आरोपींनी तिचा खून करून प्रसाद म्हणून नरडीचे रक्त प्राशन केले होते. नंतर यातीलच होमगार्ड राहिलेल्या तिच्या नात्यातील आजीनेच सपनाच्या मारेक-याचा शोध घ्यावा म्हणून आंदोलन केले होते.