शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

यवतमाळ: सपना पळसकर नरबळी प्रकरणी सात आरोपींना फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 21:13 IST

या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने सात आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच अन्य एका महिला आरोपीला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.आरोपी देविदास हा सपनाचा मामा, तर पुनाजी हा तिचा आजोबा आहे. अन्य आरोपीही सपनाचे दूरचे नातेवाईकच होते.

यवतमाळ, दि. 14 - यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या घाटंजी येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणी यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने सात आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच अन्य एका महिला आरोपीला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील चोरंबा गावात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या सपना पळसकर या बालिकेच्या नरबळीप्रकरणाने यवतमाळ जिल्हा हादरला होता.  

यवतमाळचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.मनोज लाल्या आत्राम (19), देविदास पुनाजी आत्राम (22), यादवराव तुकाराम टेकाम (50), पुनाजी महादेव आत्राम (54), रामचंद्र गणपत आत्राम (70), मोतीराम महादेव मेश्राम (५४), यशोदा पांडुरंग मेश्राम (60, सर्व रा. चोरंबा ता. घाटंजी जि. यवतमाळ) अशी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच दुर्गा शिरभाते हिला नरबळीच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत पाच वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

यातील आरोपी देविदास हा सपनाचा मामा, तर पुनाजी हा तिचा आजोबा आहे. अन्य आरोपीही सपनाचे दूरचे नातेवाईकच होते. सपना गोपाल पळसकर (7) रा. चोरंबा या बालिकेचा 24 आॅक्टोबर 2012 रोजी दस-याच्या दिवशी सायंकाळी 7.30 वाजता घरासमोरुन अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला होता. मृत सपनाची आई शारदा गोपाल पळसकर हिच्या फिर्यादीवरून घाटंजी पोलिसांनी प्रथम खुनाचा (३०२) व नंतर तपासादरम्यान भादंवि 363, 364, 201, 120 (ब), 34 कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदनसिंग बायस यांनी या गाजलेल्या नरबळी प्रकरणाचा काटेकोर तपास करून 20 आॅगस्ट 2013 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.या खटल्यात 13 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता शुभांगी वीरेंद्र दरणे, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. गणेश धात्रक यांनी काम पाहिले. हे प्रकरण अंगावर शहारे आणणारे आहे. आरोपींनी तिचा खून करून प्रसाद म्हणून नरडीचे रक्त प्राशन केले होते. नंतर यातीलच होमगार्ड राहिलेल्या तिच्या नात्यातील आजीनेच सपनाच्या मारेक-याचा शोध घ्यावा म्हणून आंदोलन केले होते.