शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाप्रसादाच्या भगरीतून ६५० जणांना विषबाधा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 09:15 IST

लातुरमधील देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथे ४४३, तर हिंगोलीतील खुडज (ता. सेनगाव) येथील २४ भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली.

लातूर/हिंगोली : महाप्रसादातील भगर खाल्ल्याने लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील ४६७ जणांना विषबाधा झाली आहे. याशिवाय परभणी, बीड आणि धुळे जिल्ह्यातही असे प्रकार घडले आहेत. पाच जिल्ह्यात एकूण ६५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या. लातुरमधील देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथे ४४३, तर हिंगोलीतील खुडज (ता. सेनगाव) येथील २४ भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली.

 वाघनाळवाडी येथे एकादशीनिमित्त गुरुवारी सायंकाळी भगरीचा प्रसाद देण्यात आला. तो खाल्ल्याने  ३१५ जणांना गुरुवारी रात्री त्रास झाला. डॉक्टरांनी गावातच ३०६ जणांवर उपचार केले. खबरवाडी (गुरधाळ) येथेही ९३ जणांवर प्रथमोपचार करण्यात आले. 

हिंगोलीत २४ भाविकांना विषबाधा  पंधरवड्यापूर्वी कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथील दीडशे भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली होती. पुन्हा गुरुवारी खुडज (ता.सेनगाव) येथील २४ भाविकांना भगरमधून विषबाधा झाली. 

परभणीत ८० बाधितपरभणी जिल्ह्यात गुरुवारी, शुक्रवारी दोन दिवस उपवासाला भगर खाल्ल्याने जिल्ह्यातील ८० जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यातील ५० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी दिली.

बीडमध्ये ५५ जणअंबाजोगाई व गेवराई तालुक्यातील तब्बल ५५ जणांना विषबाधा झाली. उपवासाची भगर खाल्ल्याने ही बाधा झाल्याचे सांगण्यात आले. या सर्वांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. 

धुळे ५२ बाधिततालुक्यातील अमळथे येथे भगर खाल्याने ५२ जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. विषबाधा झालेल्यांमध्ये पाच बालके, २० महिलांचाही समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.  

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाMahashivratriमहाशिवरात्रीhospitalहॉस्पिटल