राजेश निस्ताने - यवतमाळ
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जानेवारी ते जून या कालावधीत राज्यभर केलेल्या कारवाईत 63 कोटी 5क् लक्ष रुपयांची अपसंपदा (बेहिशेबी मालमत्ता) उघडकीस आणली. शिवाय ट्रॅपमनी म्हणून 1 कोटी 55 लाख रुपयेही जप्त केले.
आतार्पयत केवळ शिपाई, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक जाळ्यात अडकणा:या या मोहिमेत आता भारतीय वनसेवेसह वर्ग 1चे अधिकारीही अडकू लागले आहेत. एसीबीने यंदा वर्षभराची कामगिरी अवघ्या सहाच महिन्यांत पूर्ण केली. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे ट्रॅप यशस्वी होतो. त्याचा शासकीय अधिकारी-कर्मचा:यांनी चांगलाच धसका घेतला आहे. या सापळ्यांमुळे शासकीय कार्यालयातील ‘मार्जीन मनी’च्या फायली तूर्त थंडबस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. लाच मागताना या यंत्रणोची आता बोबडी वळते आहे. फाईल मार्गीही लावत नाहीत आणि स्पष्टपणो लाचही मागत नाहीत, अशी स्थिती आहे.
2क्14मध्ये जानेवारी ते जून या काळात एसीबीने शासनाच्या 38 खात्यांत तब्बल 566 ट्रॅप केले. त्यात 772 आरोपींना अटक करण्यात आली. यात ट्रॅपमनी म्हणून 1 कोटी 55 लाख 51 हजार 5क्6 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 2क्13मधील जानेवारी ते जूनच्या कारवाईची तुलना केल्यास या वर्षी अवघ्या सहाच महिन्यांत ट्रॅप 341ने (1क्8 टक्के) वाढल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, अमरावती येथील आदिवासी विकास अपर आयुक्त भास्कर वाळींबे (आयएफएस) याच्यासारखे काही बडे मासे पहिल्यांदाच एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. बेहिशेबी मालमत्तेचे एकूण 43 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात 63 कोटी 55 लाख 41 हजार 454 रुपयांची अपसंपदा जप्त करण्यात आली आहे.
च्लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा सर्वानीच धसका घेतला आहे. मात्र ही खास मोहीम नसून रुटीन वर्क असल्याचे मुंबई मुख्यालयातून सांगण्यात आले. पूर्वी एसीबीचे अनेक ट्रॅप फेल होत होते. त्यामागे एसीबीतील खबरी, लिकेजेस कारणीभूत ठरत होते.
च्मात्र, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या कार्यकाळात खबरींना चाप बसला आणि लिकेजेसही थांबले. आता पंचांसमक्ष लाच मागितल्याचे सिद्ध झाले तरी थेट गुन्हा दाखल होऊ लागला आहे.