शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

गारपिटीत ६०१ शेतक-यांच्या आत्महत्या!

By admin | Updated: April 21, 2015 06:34 IST

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीट झाली तेव्हा ६०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र त्यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांनी गारपीटीमुळे नुकसान झाल्यामुळे आ

मुंबई : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीट झाली तेव्हा ६०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र त्यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांनी गारपीटीमुळे नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत, असा दावा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत केला. सिंह यांनी केलेल्या या दाव्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले असून, सरकार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुचेष्टा करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी उपस्थित झालेल्या चर्चेला संसदेत उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री सिंह म्हणाले, की महाराष्ट्रातील केवळ तीन शेतकऱ्यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. तशी माहिती आपणास राज्य सरकारकडून प्राप्त झाली आहे. राधामोहन यांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, सरकारने दिलेली आकडेवारी चुकीची असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. सरकारविरुद्ध आम्ही प्रत्येक जिल्ह्णात आंदोलन करणार आहोत, असेही खा. चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, राज्याचे कृषि व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या विधानामुळे विनाकारण गहजब केला गेला. अवकाळी पाऊस व गारपीट या काळात आत्महत्या करणाऱ्या ६०१ शेतकऱ्यांपैकी १४१ शेतकऱ्यांचे कुटुंबिय सरकारी मदतीस पात्र ठरले. १११ शेतकऱ्यांचे कुटुंबीय मदतीस अपात्र ठरले. २५९ शेतकरी आत्महत्या प्रकरणात तपास सुरू आहे. या शेतकऱ्यांनी कोणत्या कारणास्तव मृत्यूला कवटाळले ते शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)