शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

गारपिटीत ६०१ शेतक-यांच्या आत्महत्या!

By admin | Updated: April 21, 2015 06:34 IST

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीट झाली तेव्हा ६०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र त्यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांनी गारपीटीमुळे नुकसान झाल्यामुळे आ

मुंबई : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीट झाली तेव्हा ६०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र त्यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांनी गारपीटीमुळे नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत, असा दावा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत केला. सिंह यांनी केलेल्या या दाव्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले असून, सरकार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुचेष्टा करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी उपस्थित झालेल्या चर्चेला संसदेत उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री सिंह म्हणाले, की महाराष्ट्रातील केवळ तीन शेतकऱ्यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. तशी माहिती आपणास राज्य सरकारकडून प्राप्त झाली आहे. राधामोहन यांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, सरकारने दिलेली आकडेवारी चुकीची असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. सरकारविरुद्ध आम्ही प्रत्येक जिल्ह्णात आंदोलन करणार आहोत, असेही खा. चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, राज्याचे कृषि व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या विधानामुळे विनाकारण गहजब केला गेला. अवकाळी पाऊस व गारपीट या काळात आत्महत्या करणाऱ्या ६०१ शेतकऱ्यांपैकी १४१ शेतकऱ्यांचे कुटुंबिय सरकारी मदतीस पात्र ठरले. १११ शेतकऱ्यांचे कुटुंबीय मदतीस अपात्र ठरले. २५९ शेतकरी आत्महत्या प्रकरणात तपास सुरू आहे. या शेतकऱ्यांनी कोणत्या कारणास्तव मृत्यूला कवटाळले ते शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)