शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीत ६०१ शेतक-यांच्या आत्महत्या!

By admin | Updated: April 21, 2015 06:34 IST

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीट झाली तेव्हा ६०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र त्यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांनी गारपीटीमुळे नुकसान झाल्यामुळे आ

मुंबई : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीट झाली तेव्हा ६०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र त्यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांनी गारपीटीमुळे नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत, असा दावा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत केला. सिंह यांनी केलेल्या या दाव्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले असून, सरकार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुचेष्टा करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी उपस्थित झालेल्या चर्चेला संसदेत उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री सिंह म्हणाले, की महाराष्ट्रातील केवळ तीन शेतकऱ्यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. तशी माहिती आपणास राज्य सरकारकडून प्राप्त झाली आहे. राधामोहन यांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, सरकारने दिलेली आकडेवारी चुकीची असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. सरकारविरुद्ध आम्ही प्रत्येक जिल्ह्णात आंदोलन करणार आहोत, असेही खा. चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, राज्याचे कृषि व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या विधानामुळे विनाकारण गहजब केला गेला. अवकाळी पाऊस व गारपीट या काळात आत्महत्या करणाऱ्या ६०१ शेतकऱ्यांपैकी १४१ शेतकऱ्यांचे कुटुंबिय सरकारी मदतीस पात्र ठरले. १११ शेतकऱ्यांचे कुटुंबीय मदतीस अपात्र ठरले. २५९ शेतकरी आत्महत्या प्रकरणात तपास सुरू आहे. या शेतकऱ्यांनी कोणत्या कारणास्तव मृत्यूला कवटाळले ते शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)