शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

गारपिटीत ६०१ शेतक-यांच्या आत्महत्या!

By admin | Updated: April 21, 2015 06:34 IST

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीट झाली तेव्हा ६०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र त्यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांनी गारपीटीमुळे नुकसान झाल्यामुळे आ

मुंबई : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीट झाली तेव्हा ६०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र त्यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांनी गारपीटीमुळे नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत, असा दावा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत केला. सिंह यांनी केलेल्या या दाव्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले असून, सरकार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुचेष्टा करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी उपस्थित झालेल्या चर्चेला संसदेत उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री सिंह म्हणाले, की महाराष्ट्रातील केवळ तीन शेतकऱ्यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. तशी माहिती आपणास राज्य सरकारकडून प्राप्त झाली आहे. राधामोहन यांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, सरकारने दिलेली आकडेवारी चुकीची असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. सरकारविरुद्ध आम्ही प्रत्येक जिल्ह्णात आंदोलन करणार आहोत, असेही खा. चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, राज्याचे कृषि व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या विधानामुळे विनाकारण गहजब केला गेला. अवकाळी पाऊस व गारपीट या काळात आत्महत्या करणाऱ्या ६०१ शेतकऱ्यांपैकी १४१ शेतकऱ्यांचे कुटुंबिय सरकारी मदतीस पात्र ठरले. १११ शेतकऱ्यांचे कुटुंबीय मदतीस अपात्र ठरले. २५९ शेतकरी आत्महत्या प्रकरणात तपास सुरू आहे. या शेतकऱ्यांनी कोणत्या कारणास्तव मृत्यूला कवटाळले ते शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)