शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेकी हल्ल्यातून सोलापुरातील ६० भाविक बचावले

By admin | Updated: July 18, 2016 21:23 IST

भयानक शांतता रस्ते मोकळे...काश्मीर हमारा हैं... वानी को किसीने मारा नही वो शहीद हुआ हैं...वानी की जयजयकार हो़.. वानी हमेशा अमर रहे...अशी गर्जना देणाऱ्या तरूणांनी भर

 - आप्पासाहेब पाटील

सोलापूर, दि. १८ -  भयानक शांतता रस्ते मोकळे...काश्मीर हमारा हैं... वानी को किसीने मारा नही वो शहीद हुआ हैं...वानी की जयजयकार हो़.. वानी हमेशा अमर रहे...अशी गर्जना देणाऱ्या तरूणांनी भर रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ यावेळी या परिसरातून जाणाऱ्या यात्रेकरूंच्या गाड्याही पेटवून देत दगडफेकीचा वर्षाव केला़ यात्रेकरूंच्या गाड्याही पेटविण्याच्या प्रयत्नात ते तरूण होते़ इतक्यात पावसाने जोरदार सुरूवात केली अन् विजेच्या कडकडाटामुळे संतप्त झालेल्या तरूणांनी तेथून पळ काढला़ त्यामुळेच आम्ही वाचलो अशी भावना प्रत्यक्षदर्शी ह.भ.प निवृत्ती सिद्राम कांबळे यांनी बोलून दाखविली़. सोलापुरातील ६० जण श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय संस्थेकडून अमरनाथ यात्रेसाठी १९ जून रोजी सोलापुरातून रवाना झाले होते़ माहुरगड, रामतीर्थ, काशी, मथुरा, द्वारका, ऋषीकेश, गंगा, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वारला भेट देऊन दर्शन घेतले़ त्यानंतर १० जुलै रोजी अमरनाथ येथे दर्शनासाठी निघालो़ १३ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास काश्मीरमध्ये पोहोचलो़ त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन १४ जुलै रोजी अमरनाथ येथील शिवलिंगाचे दर्शन घेऊन तिथेच मुक्काम केला़ १५ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूरकडे येण्यास निघालो होतो़ काश्मीरपासून काही अंतरावर असलेल्या नागमणी गुंज या गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ दीडशे ते दोनशे तरूणांनी या परिसरात गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ यावेळी त्यांच्या हातात काठ्या, तलवारी होत्या़ काश्मीर जिंदाबादच्या घोषणा देत वीना हमारा मरा नही वो शहीद हुआ हैं़़़चा नारा देत दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरूवात केली़ यावेळी आमच्याही गाडीवर जोरदार दगडफेक करण्यात आली़ या दगडफेकीमुळे सोलापूरहून आलेले सर्व भाविक भयभीत होऊन सीटखाली जाऊन बसले़ काही वेळाने जोरदार पावसाने सुरूवात केली़ विजेचा कडकडाट सुरू झाल्याने त्या तरूणांनी या परिसरातून पळ काढला़ जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आलेल्या तरुणांच्या कचाट्यातून वाचल्याने सोलापुरातील ६० भाविकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ आमच्याबरोबर १० ते १५ यात्रेकरूंच्या गाड्या या कचाट्यात अडकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी ह.भ.प निवृत्ती कांबळे यांनी दिली़.यात्रेकरूंमध्ये भीतीचे वातावरणहिजबुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बुरहान वानी याला चकमकीत ठार केल्यानंतर काश्मिरात भडकलेल्या हिंसक आंदोलनाचा सगळ्यात मोठा फटका अमरनाथ यात्रेकरूंना बसला आहे़ या यात्रेसाठी गेलेल्या सोलापुरातील काही यात्रेकरूंच्या गाड्यांवर दगडफेक केली़. का सुरूवात झाली हिंसाचारालाबुरहान वानी हा दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता़ हा चकमकीत ठार झाला़ वानीला ठार केल्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी जम्मू-काश्मीर अक्षरश: पेटवलं होतं. काश्मीरमध्ये ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक करून अशांतता माजविण्याचा प्रयत्न केला़ या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झालाय़ खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अमरनाथ यात्रा स्थगित केली आहे पण दहशतीच्या वातावरणात यात्रेकरूंना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय अशी खंत ह.भ.प निवृत्ती इंगळे महाराज यांनी बोलून दाखविली़.कोणीच केली नाही मदतयात्रेकरूंच्या असहायतेचा फायदा घेऊन हॉटेलवाल्यांनी खोल्यांचे आणि जेवणाचे दर प्रचंड वाढविले़ यावेळी आमच्यासोबत असलेल्या यात्रेकरूंनी स्थानिकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला पण तेही रागाने बोलून मदत करण्यास नकार दिला़ अमरनाथहून सोलापूरला परत येत असताना आम्ही जिवंत येतोकी नाही याची शाश्वती नव्हती, मात्र देवाच्या कृपेने आम्ही बचावलो असल्याची भावना निवृत्ती इंगळे महाराज यांनी बोलून दाखविली़यात्रेत या भाविकांचा होता सहभाग़श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय संस्था, सोलापूरच्या वतीने अमरनाथ यात्रेचे आयोजन केले होते़ यात सोलापुरातील ६० जणांचा सहभाग होता़ यात २५ पुरूष व ३५ स्त्रियांचा समावेश होता़ माहुरगड, रामतीर्थ, काशी, मथुरा, द्वारका, गंगा, गंगोत्री, हरिद्वार यासह अन्य पर्यटन व देवदर्शनाच्या स्थळांना भेटी दिल्या़ यात दिंडीचे संयोजक ह़भ़प ज्ञानेश्वर संभाजी साळे, मुख्य प्रवचनकार मुरलीधर लेंडवे महाराज, वारकरी आप्पा कांबळे, विमल कांबळे, शिंदे, पवार आदी महिला व पुरूषांचा समावेश होता़