शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

वीज कोसळून ६ ठार, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 04:14 IST

राज्यभरात अनेक ठिकाणी रविवार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यवतमाळ आणि सोलापूरमध्ये वीज पडून सहा जण ठार, तर पाच जण जखमी झाले.

यवतमाळ/सोलापूर - राज्यभरात अनेक ठिकाणी रविवार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यवतमाळ आणि सोलापूरमध्ये वीज पडून सहा जण ठार, तर पाच जण जखमी झाले.यवतमाळमध्ये दुपारी वादळ, पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने वेणी व वाकोडी शिवारात काही शेतकरी आणि शेतमजूर एका निंबाच्या झाडाखाली थांबले होते. तेथे अचानक वीज कोसळून चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. साडेतीनच्या सुमारास महागाव तालुक्याच्या वेणी (वाकोडी) शिवारात ही घटना घडली. प्रभू नारायण जाधव (४५), पंडित दिगांबर हरणे (३०), अनिल विष्णू सगरुळे (२५), लक्ष्मण रमेश चोपडे (१८) अशी मृतांची नावे आहेत.अक्कलकोट शहर व तालुक्याला रविवारी गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. सायं. पाचच्या सुमारास वीज कोसळून चिंचोळी (न.) येथील अलाउद्दीन दसगीर बेनुरे हा शेतकरी ठार झाला. बेनुरे हे शेळ्या चरण्यास घेऊन गेले असता ही दुर्घटना घडली. सायंकाळी सांगोला तालुक्यातील काशिदवाडी येथे वीज पडून बाळासाहेब सावंत (५०) यांचा मृत्यू झाला.पुढील दोन दिवस पावसाचा अंदाजयवतमाळ आणि नांदेड येथे रविवारी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला़ पुढील दोन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाजहवामान विभागाने व्यक्त केला आहे़

टॅग्स :Deathमृत्यूnewsबातम्या