शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन ५६ कुटुंबांनी सोडले गाव; महापुरुषांच्या फलकावरून वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:14 IST

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामसभा घेऊन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :  महापुरुषांच्या नावाचा फलक लावण्यावरून वाद विकोपाला गेल्यानंतर ५६ दलित कुटुंबांनी चिल्यापिल्यांसह धान्य, कपड्यांसह बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन गाव सोडले. ही कुटुंबे मजल-दरमजल करत शुक्रवारी सकाळी गडचिरोलीत दाखल झाली. मुख्य चौकात निषेध सभा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचविणारी ही घटना चामोर्शी तालुक्यातील नवरगावात घडली.

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामसभा घेऊन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे.चामोर्शीपासून १५ किलोमीटर अंतरावरील नवरगाव हे ६६६ लोकसंख्येचे गाव. येथे सर्व लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहतात.   वर्षभरापासून येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरून वाद धुमसत आहे. हा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, ग्रामसभेने अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पोलिस बंदोबस्तात फलक हटविला. त्यानंतर दलित समाजाने तीव्र रोष व्यक्त करत बिऱ्हाड घेऊन गाव सोडले. 

ग्रामसभेत ठराव घेऊनच फलकांबाबतचे निर्णय घेतले आहेत. सर्वांना विश्वासात घेतल्यानंतरही ग्रामसभेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे अशोभनीय आहे. गावात सलोखा राहावा, हीच आमची भूमिका आहे. - खुशाल कुकडे, सरपंच, नवरगाव

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली