शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन ५६ कुटुंबांनी सोडले गाव; महापुरुषांच्या फलकावरून वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:14 IST

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामसभा घेऊन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :  महापुरुषांच्या नावाचा फलक लावण्यावरून वाद विकोपाला गेल्यानंतर ५६ दलित कुटुंबांनी चिल्यापिल्यांसह धान्य, कपड्यांसह बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन गाव सोडले. ही कुटुंबे मजल-दरमजल करत शुक्रवारी सकाळी गडचिरोलीत दाखल झाली. मुख्य चौकात निषेध सभा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचविणारी ही घटना चामोर्शी तालुक्यातील नवरगावात घडली.

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामसभा घेऊन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे.चामोर्शीपासून १५ किलोमीटर अंतरावरील नवरगाव हे ६६६ लोकसंख्येचे गाव. येथे सर्व लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहतात.   वर्षभरापासून येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरून वाद धुमसत आहे. हा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, ग्रामसभेने अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पोलिस बंदोबस्तात फलक हटविला. त्यानंतर दलित समाजाने तीव्र रोष व्यक्त करत बिऱ्हाड घेऊन गाव सोडले. 

ग्रामसभेत ठराव घेऊनच फलकांबाबतचे निर्णय घेतले आहेत. सर्वांना विश्वासात घेतल्यानंतरही ग्रामसभेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे अशोभनीय आहे. गावात सलोखा राहावा, हीच आमची भूमिका आहे. - खुशाल कुकडे, सरपंच, नवरगाव

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली