शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन ५६ कुटुंबांनी सोडले गाव; महापुरुषांच्या फलकावरून वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:14 IST

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामसभा घेऊन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :  महापुरुषांच्या नावाचा फलक लावण्यावरून वाद विकोपाला गेल्यानंतर ५६ दलित कुटुंबांनी चिल्यापिल्यांसह धान्य, कपड्यांसह बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन गाव सोडले. ही कुटुंबे मजल-दरमजल करत शुक्रवारी सकाळी गडचिरोलीत दाखल झाली. मुख्य चौकात निषेध सभा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचविणारी ही घटना चामोर्शी तालुक्यातील नवरगावात घडली.

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामसभा घेऊन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे.चामोर्शीपासून १५ किलोमीटर अंतरावरील नवरगाव हे ६६६ लोकसंख्येचे गाव. येथे सर्व लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहतात.   वर्षभरापासून येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरून वाद धुमसत आहे. हा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, ग्रामसभेने अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पोलिस बंदोबस्तात फलक हटविला. त्यानंतर दलित समाजाने तीव्र रोष व्यक्त करत बिऱ्हाड घेऊन गाव सोडले. 

ग्रामसभेत ठराव घेऊनच फलकांबाबतचे निर्णय घेतले आहेत. सर्वांना विश्वासात घेतल्यानंतरही ग्रामसभेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे अशोभनीय आहे. गावात सलोखा राहावा, हीच आमची भूमिका आहे. - खुशाल कुकडे, सरपंच, नवरगाव

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली