शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

पनवेल, भिवंडीमध्ये ५५ टक्के मतदान

By admin | Updated: May 25, 2017 02:27 IST

रायगड जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या पनवेल महापालिका आणि भिवंडी महापालिका निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल/भिवंडी : रायगड जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या पनवेल महापालिका आणि भिवंडी महापालिका निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले. भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेसाठी बुधवारी झालेली निवडणूक महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा शांततेत पार पडली.पनवेल महापालिकेसाठी ४१८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. महापालिकेच्या ७८ जागांसाठी ५७० मतदान केंद्रांवर ५३ टक्के मतदान झाले. सुट्यांचे दिवस असल्याने अनेक मतदार गावी गेल्याने मतदानाचा टक्का घसरला. मात्र, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदार सकाळपासूनच बाहेर पडल्याचे दिसून आले. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. मात्र, खारघरमध्ये अपक्ष उमेदवार किरण नरसिंग मोरे यांना अज्ञात इसमांनी मारहाण करून पळ काढला. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी सर्वच पक्षांतील कार्यकर्ते मतदारांच्या घरापर्यंत पोहोचले होते, तर अनेकांनी मतदारांना गावावरून आणण्यासाठी गाड्यादेखील पाठविल्या होत्या. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले. मात्र, दुपारी मतदानाचा वेग मंदावला होता. उन्हाचा कडाका कमी झाल्याने दुपारी ४नंतर मतदारांचा मतदार केंद्रांबाहेर ओघ पाहावयास मिळाला. ४ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ४५पर्यंत पोहोचला होता.पनवेल महापालिकेच्या या निवडणुकीवर २०१९मधील विधानसभेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चुरस सुरू आहे. अडीच हजार पोलिसांना विविध मतदार केंद्रांबाहेर तैनात करण्यात आले होते. मतदारांना ने-आण करण्यासाठी उमेदवारांनी मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामुळे मतदान केंद्रांबाहेर काही प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती.भिवंडी-निजामपूर शहर महापालिका निवडणुकीत साधारण ७ ते ८ ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आल्या. या निवडणुकीत १५० कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आल्याची माहिती डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. पहिल्या दोन तासांत सरासरी ९ टक्के मतदान नोंदविण्यात आले. नंतरच्या दर दोन तासांनी त्यात सरासरी १० टक्क्यांनी वाढ होत होती. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते. त्यानुसार, साधारणत: ५.३० वाजेपर्यंत अंदाजे ५५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला.

‘‘भयमुक्त परिस्थिती निर्माण करण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले. तसेच पोलिसांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यामुळे निश्चितपणे मागील वर्षीपेक्षा यंदा मतदान जास्त झाले आहे.’’ - डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, भिवंडी- निजामपूर शहर महापालिकाकाँग्रेसकडून एकही तक्रार नाहीमतदानाच्या काळात शिवसेना आणि भाजपा यांच्याकडून आयुक्तांकडे वारंवार तक्रारी येत होत्या. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाकडून एकही तक्रार आली नसल्याची माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.