शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल, भिवंडीमध्ये ५५ टक्के मतदान

By admin | Updated: May 25, 2017 02:27 IST

रायगड जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या पनवेल महापालिका आणि भिवंडी महापालिका निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल/भिवंडी : रायगड जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या पनवेल महापालिका आणि भिवंडी महापालिका निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले. भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेसाठी बुधवारी झालेली निवडणूक महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा शांततेत पार पडली.पनवेल महापालिकेसाठी ४१८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. महापालिकेच्या ७८ जागांसाठी ५७० मतदान केंद्रांवर ५३ टक्के मतदान झाले. सुट्यांचे दिवस असल्याने अनेक मतदार गावी गेल्याने मतदानाचा टक्का घसरला. मात्र, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदार सकाळपासूनच बाहेर पडल्याचे दिसून आले. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. मात्र, खारघरमध्ये अपक्ष उमेदवार किरण नरसिंग मोरे यांना अज्ञात इसमांनी मारहाण करून पळ काढला. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी सर्वच पक्षांतील कार्यकर्ते मतदारांच्या घरापर्यंत पोहोचले होते, तर अनेकांनी मतदारांना गावावरून आणण्यासाठी गाड्यादेखील पाठविल्या होत्या. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले. मात्र, दुपारी मतदानाचा वेग मंदावला होता. उन्हाचा कडाका कमी झाल्याने दुपारी ४नंतर मतदारांचा मतदार केंद्रांबाहेर ओघ पाहावयास मिळाला. ४ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ४५पर्यंत पोहोचला होता.पनवेल महापालिकेच्या या निवडणुकीवर २०१९मधील विधानसभेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चुरस सुरू आहे. अडीच हजार पोलिसांना विविध मतदार केंद्रांबाहेर तैनात करण्यात आले होते. मतदारांना ने-आण करण्यासाठी उमेदवारांनी मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामुळे मतदान केंद्रांबाहेर काही प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती.भिवंडी-निजामपूर शहर महापालिका निवडणुकीत साधारण ७ ते ८ ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आल्या. या निवडणुकीत १५० कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आल्याची माहिती डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. पहिल्या दोन तासांत सरासरी ९ टक्के मतदान नोंदविण्यात आले. नंतरच्या दर दोन तासांनी त्यात सरासरी १० टक्क्यांनी वाढ होत होती. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते. त्यानुसार, साधारणत: ५.३० वाजेपर्यंत अंदाजे ५५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला.

‘‘भयमुक्त परिस्थिती निर्माण करण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले. तसेच पोलिसांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यामुळे निश्चितपणे मागील वर्षीपेक्षा यंदा मतदान जास्त झाले आहे.’’ - डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, भिवंडी- निजामपूर शहर महापालिकाकाँग्रेसकडून एकही तक्रार नाहीमतदानाच्या काळात शिवसेना आणि भाजपा यांच्याकडून आयुक्तांकडे वारंवार तक्रारी येत होत्या. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाकडून एकही तक्रार आली नसल्याची माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.