शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

पनवेल, भिवंडीमध्ये ५५ टक्के मतदान

By admin | Updated: May 25, 2017 02:27 IST

रायगड जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या पनवेल महापालिका आणि भिवंडी महापालिका निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल/भिवंडी : रायगड जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या पनवेल महापालिका आणि भिवंडी महापालिका निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले. भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेसाठी बुधवारी झालेली निवडणूक महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा शांततेत पार पडली.पनवेल महापालिकेसाठी ४१८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. महापालिकेच्या ७८ जागांसाठी ५७० मतदान केंद्रांवर ५३ टक्के मतदान झाले. सुट्यांचे दिवस असल्याने अनेक मतदार गावी गेल्याने मतदानाचा टक्का घसरला. मात्र, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदार सकाळपासूनच बाहेर पडल्याचे दिसून आले. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. मात्र, खारघरमध्ये अपक्ष उमेदवार किरण नरसिंग मोरे यांना अज्ञात इसमांनी मारहाण करून पळ काढला. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी सर्वच पक्षांतील कार्यकर्ते मतदारांच्या घरापर्यंत पोहोचले होते, तर अनेकांनी मतदारांना गावावरून आणण्यासाठी गाड्यादेखील पाठविल्या होत्या. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले. मात्र, दुपारी मतदानाचा वेग मंदावला होता. उन्हाचा कडाका कमी झाल्याने दुपारी ४नंतर मतदारांचा मतदार केंद्रांबाहेर ओघ पाहावयास मिळाला. ४ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ४५पर्यंत पोहोचला होता.पनवेल महापालिकेच्या या निवडणुकीवर २०१९मधील विधानसभेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चुरस सुरू आहे. अडीच हजार पोलिसांना विविध मतदार केंद्रांबाहेर तैनात करण्यात आले होते. मतदारांना ने-आण करण्यासाठी उमेदवारांनी मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामुळे मतदान केंद्रांबाहेर काही प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती.भिवंडी-निजामपूर शहर महापालिका निवडणुकीत साधारण ७ ते ८ ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आल्या. या निवडणुकीत १५० कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आल्याची माहिती डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. पहिल्या दोन तासांत सरासरी ९ टक्के मतदान नोंदविण्यात आले. नंतरच्या दर दोन तासांनी त्यात सरासरी १० टक्क्यांनी वाढ होत होती. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते. त्यानुसार, साधारणत: ५.३० वाजेपर्यंत अंदाजे ५५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला.

‘‘भयमुक्त परिस्थिती निर्माण करण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले. तसेच पोलिसांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यामुळे निश्चितपणे मागील वर्षीपेक्षा यंदा मतदान जास्त झाले आहे.’’ - डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, भिवंडी- निजामपूर शहर महापालिकाकाँग्रेसकडून एकही तक्रार नाहीमतदानाच्या काळात शिवसेना आणि भाजपा यांच्याकडून आयुक्तांकडे वारंवार तक्रारी येत होत्या. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाकडून एकही तक्रार आली नसल्याची माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.