शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘समृद्धी’ला लागले 55 लाख मे. टन सिमेंट! एवढ्यात काय काय बांधता आले असते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 07:46 IST

महाराष्ट्राच्या अर्थकारणात गेम चेंजर ठरू शकणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्यानिमित्ताने...

- विनय उपासनी, मुख्य उपसंपादकखाद्या पायाभूत प्रकल्पाच्या उभारणीची घोषणा झाली की हा प्रकल्प हवाच का, काय गरज आहे त्याची इथपासून प्रस्तावित प्रकल्पाच्या फायद्या- तोट्याच्या गणितापर्यंतची चर्चा सर्व स्तरावर सुरू होते. सुरुवातीला स्थानिकांचा विरोध होतो. विरोधाची धार कमी करण्यासाठी सरकारला प्रकल्पग्रस्तांसाठी विविध सवलतींची घोषणा करावी लागते. यथावकाश पायाभूत प्रकल्प मार्गी लागतो. त्यानंतर प्रकल्पाची व्याप्ती पाहून मग त्याची वाहवा सुरू होते. अगदी अशीच कथा आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाची. गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या लांबीच्या भव्यदिव्य द्रुतगती महामार्गाची उभारणीच झाली नव्हती. त्यामुळे २०१५ मध्ये जेव्हा समृद्धी महामार्गाच्या उभारणीची घोषणा झाली तेव्हापासून हा प्रकल्प चर्चेत राहिला. ७०१ किमी लांबीचा हा द्रुतगती मार्ग देशातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे. 

दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडत जाणारा महाराष्ट्र शासनाचा समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अखेरीस मार्गी लागला आहे. या द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी विक्रमी असे बांधकाम साहित्य लागले. 

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरसमृद्धी महामार्गामुळे देशात महाराष्ट्राची मान उंचावणार आहे. सर्वाधिक लांबीचे द्रुतगती महामार्ग असलेल्या राज्यांच्या पंक्तीत महाराष्ट्र आता दुसऱ्या क्रमांकावर असेल. याआधी महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर होता.

पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. उत्तर प्रदेशात १,३९६ किमी लांबीचे आठ द्रुतगती महामार्ग आहेत. महाराष्ट्रात समृद्धी महामार्गामुळे आता ८१२ किमी लांबीचे दोन द्रुतगती महामार्ग असतील.  

किती साहित्य लागले? ५५,४९,०६० मेट्रिक टन सिमेंटतुलनाच करायची झाल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात सिमेंट आणि स्टील वापरल्यास शेकडो पाच ते सात मजली इमारती उभारल्या जाऊ शकतात.  समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी 

३६,३२१ मजुरांनी घाम गाळला. त्यातील बहुतांशी कामगार परराज्यातील होते, हे विशेष. 

७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे बांधकाम १६ टप्प्यांत विभागण्यात आले.  एकाच कंपनीकडे एवढ्या मोठ्या महामार्गाच्या उभारणीचे कंत्राट देणे इष्ट ठरले नसते म्हणून हा निर्णय घेण्यात आला.   

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग