शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ला लागले 55 लाख मे. टन सिमेंट! एवढ्यात काय काय बांधता आले असते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 07:46 IST

महाराष्ट्राच्या अर्थकारणात गेम चेंजर ठरू शकणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्यानिमित्ताने...

- विनय उपासनी, मुख्य उपसंपादकखाद्या पायाभूत प्रकल्पाच्या उभारणीची घोषणा झाली की हा प्रकल्प हवाच का, काय गरज आहे त्याची इथपासून प्रस्तावित प्रकल्पाच्या फायद्या- तोट्याच्या गणितापर्यंतची चर्चा सर्व स्तरावर सुरू होते. सुरुवातीला स्थानिकांचा विरोध होतो. विरोधाची धार कमी करण्यासाठी सरकारला प्रकल्पग्रस्तांसाठी विविध सवलतींची घोषणा करावी लागते. यथावकाश पायाभूत प्रकल्प मार्गी लागतो. त्यानंतर प्रकल्पाची व्याप्ती पाहून मग त्याची वाहवा सुरू होते. अगदी अशीच कथा आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाची. गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या लांबीच्या भव्यदिव्य द्रुतगती महामार्गाची उभारणीच झाली नव्हती. त्यामुळे २०१५ मध्ये जेव्हा समृद्धी महामार्गाच्या उभारणीची घोषणा झाली तेव्हापासून हा प्रकल्प चर्चेत राहिला. ७०१ किमी लांबीचा हा द्रुतगती मार्ग देशातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे. 

दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडत जाणारा महाराष्ट्र शासनाचा समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अखेरीस मार्गी लागला आहे. या द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी विक्रमी असे बांधकाम साहित्य लागले. 

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरसमृद्धी महामार्गामुळे देशात महाराष्ट्राची मान उंचावणार आहे. सर्वाधिक लांबीचे द्रुतगती महामार्ग असलेल्या राज्यांच्या पंक्तीत महाराष्ट्र आता दुसऱ्या क्रमांकावर असेल. याआधी महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर होता.

पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. उत्तर प्रदेशात १,३९६ किमी लांबीचे आठ द्रुतगती महामार्ग आहेत. महाराष्ट्रात समृद्धी महामार्गामुळे आता ८१२ किमी लांबीचे दोन द्रुतगती महामार्ग असतील.  

किती साहित्य लागले? ५५,४९,०६० मेट्रिक टन सिमेंटतुलनाच करायची झाल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात सिमेंट आणि स्टील वापरल्यास शेकडो पाच ते सात मजली इमारती उभारल्या जाऊ शकतात.  समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी 

३६,३२१ मजुरांनी घाम गाळला. त्यातील बहुतांशी कामगार परराज्यातील होते, हे विशेष. 

७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे बांधकाम १६ टप्प्यांत विभागण्यात आले.  एकाच कंपनीकडे एवढ्या मोठ्या महामार्गाच्या उभारणीचे कंत्राट देणे इष्ट ठरले नसते म्हणून हा निर्णय घेण्यात आला.   

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग