शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना ५० हजार बीजवाटप

By admin | Updated: July 11, 2016 00:24 IST

श्री संत तुकाराममहाराज यांच्या दिंडीमध्ये ५० हजार बीजवाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.

बारामती : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! हा बोध लक्षात घेऊन श्री संत तुकाराममहाराज यांच्या दिंडीमध्ये ५० हजार बीजवाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. हजारो वारकरीदेखील उपक्रमाचा घटक बनले आहेत. वारकऱ्यांच्या माध्यमातून या बीजांचे रोपण होणार आहे.बारामती तालुकामध्ये नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना सर्पदंश, तसेच सर्पांबद्दल असणारे समज-गैरसमज या विषयावर प्रबोधन केले जाते. तसेच सर्पदंशावर प्रथमोपचार यावर मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी माहितीपत्रक वाटले जातात. विसाव्यासाठीच्या जागा शोधून देण्यास मदत करतात. अडगळीच्या भागात तंबू लावले असतील त्या आजूबाजूचा परिसर वस्तीत तपासणी केली जाते. तसेच, विंचू, साप आदी प्राण्यांचा उपद्रव होऊ नये, यासाठी मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमाची प्रेरणा युवावर्गाने घेतल्यास ५० हजार बियांची लागवड सहज होणे शक्य आहे. यापूर्वी संस्थेच्या युवकांनी थेट सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जाऊन बियांचे रोपण केले आहे. पशुपक्ष्यांसाठी झाडे नितांत गरजेची आहेत. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तो आता कायमस्वरुपी राबविला जाणार आहे. आज ५० हजार बीजवाटपापैकी ५० टक्के झाडे उगवल्यास निसर्गसंवर्धनाला हातभार लागेल. एका गावातून ५० हजार बीजवाटपाचा उपक्रम यशस्वी झाला. त्यासाठी युवकांचा सामूहिक सहभाग महत्त्वाचा ठरला. पालखी मार्गावरील ७५ टक्के गावांनी हा उपक्रम राबवल्यास दरवर्षी या बीजवाटपातून हरित मार्ग तयार होतील. हजारो ठिकाणी वृक्षारोपण होईल. लाखो वृक्ष उगवले जातील. आज आपण सर्वांनी एक संकल्पना मनात घेऊन एक एक पाऊल पुढे टाकत सर्व ठिकाणी हा उपक्रम राबवावा, असे नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष बबलू कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, या उपक्रमात कांबळे यांच्यासह श्रीकांत पवार, विवेक पांडकर, कार्तिक शहा, आनंद सोनवणे, सागर भंडारे, सोमेश बांदल, सोहम जोगळेकर, सचिन गायकवाड, डॉ. इ. ठ. जगताप आदींनी सहभाग घेतला.