शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

५०० ग्रामपंचायती झाल्या डिजिटल

By admin | Updated: August 16, 2016 01:41 IST

जन्म दाखल्यापासून आधार कार्डपर्यंत सर्व शासकीय सेवा आॅनलाईन पद्धतीने देण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल नेटवर्कने जोडण्यात येत असून

मुंबई : जन्म दाखल्यापासून आधार कार्डपर्यंत सर्व शासकीय सेवा आॅनलाईन पद्धतीने देण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल नेटवर्कने जोडण्यात येत असून सध्या ५०० ग्रामपंचायती डिजीटल झाल्या आहेत. अशा प्रकारची कामगिरी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहले राज्य ठरले असून २०१८ अखेरपर्यंत राज्यातील सर्व २८ हजार ग्रामपंचायती डिजीटल नेटवर्कने जोडण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित माहिती तंत्रज्ञानविषयक सोहळ्यात विविध डिजीटल उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपले सरकार या पोर्टलवरील ‘महा योजना’ या नव्या सेवेचे लोकार्पण करण्यात आले. सध्या ‘आपले सरकार’ या पोर्टलच्या माध्यमातून १५६ सेवा देण्यात येत असून आज त्यात आणखी ५० सेवांची भर घालण्यात आली. येत्या २ आॅक्टोबरपर्यंत सर्वच शासकीय योजना आॅनलाईन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. डिजिटल ग्रामपंचायतींमुळे ग्रामीण भागांतील मुलांसाठी ज्ञानाची दारे खुली झाली आहेत. जगातील सर्वोत्तम ज्ञान त्यांना घेता येणार आहे. यापुढील काळात राज्यातील प्रत्येक शासकीय शाळा, आश्रमशाळा, रुग्णालये इंटरनेटद्वारे जोडण्यात येणार आहेत. ग्रामीण रुग्णालये क्लाऊड स्टोरेजच्या माध्यमातून शहरातील मोठ्या रुग्णालयांशी जोडून त्यांच्या सेवा ग्रामीण भागात पुरविण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण सेवांमध्ये गुणात्मक फरक पडत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटीची माहिती व्हावी, यासाठी काढण्यात आलेल्या सायबर सुरक्षा जागृती पुस्तिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सायबर सिक्युरिटी संदर्भात जनजागृती करण्यासाठी क्विक हिल ही कंपनी राज्य शासनास मदत करणार आहे. यासंदभार्तील सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. आपले सरकारमध्ये आजपासून समाविष्ट झालेल्या योजनांमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक तसेच अपंगांचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणांची पुनर्मोजणी, दुय्यम गुणपत्रिका, दुय्यम पदवी प्रमाणपत्र, नवीन वीज पुरवठा अर्ज, सदोष विद्युत मीटर तक्रार आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)स्मार्ट अँड सेफ नागपूरसाठी एल अँड टीबरोबर करारनागपूरला देशातील पहिले स्मार्ट अँड सेफ शहर बनविण्यासाठी एल अँड टी या कंपनी बरोबर करार करण्यात आला. नागपूरमध्ये सीसीटीव्ही आणि कमांड सर्व्हेलन्स यंत्रणा बसविण्यात येणार असून संपूर्ण शहरात हॉटस्पॉट बसवून वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. नागपूरप्रमाणेच नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती ही शहरे स्मार्ट करण्यासाठी एच.पी. या कंपनीबरोबर राज्य शासनाने सामंजस्य करार केला आहे. ही शहरे स्मार्ट आणि डिजिटल करण्यासाठी एचपी १८०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.