शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

झोपडपट्टी पुनर्विकासासाठी लागणार ५० टक्क्यांची अनुमती

By यदू जोशी | Updated: June 23, 2020 06:15 IST

आता झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत लवकरच महत्त्वाचे बदल करण्याचे नगर विकास विभागाने ठरविले आहे.

यदु जोशी मुंबई : मुंबई, ठाण्यासह राज्याच्या विविध भागांत कोरोनाचा संसर्ग हा झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचे समोर आल्यामुळे आता झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत लवकरच महत्त्वाचे बदल करण्याचे नगर विकास विभागाने ठरविले आहे. या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प वर्षानुवर्षे रेंगाळतात. पुनर्विकासासाठी रहिवाशांच्या सहमतीपासून अनेक अडचणी येतात. त्यामुळे झोपडपट्टीमुक्त शहराचे स्वप्न रखडते. हे लक्षात घेऊन आता त्यातील उणिवा दूर करण्यात येतील आणि त्यासाठीची तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. दाटीवाटीने असलेल्या वस्त्या, अरुंद गल्ल्या आणि खुराड्यासारखी असलेली लहान घरे यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये एका व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर किमान आठ ते दहा जणांना त्याची लागण होते. झोपडपट्ट्यांव्यतिरिक्त इतर भागात हे प्रमाण एकास तीन किंवा चार इतके असते. त्यामुळेच आता झोपडपट्ट्यांचा जलद व नियोजनबद्ध विकास हा मुद्दा नगर विकास विभागाने प्राधान्याने हाती घेतला आहे....तर स्वत:च पुनर्विकासझोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या उभारणीसाठी ठरविलेला बिल्डर बरेचदा प्रकल्पातून अंग काढून घेतो किंवा इतरांकडे हस्तांतरित करतो. त्यामुळे प्रकल्प रेंगाळतो म्हणून पुनर्विकासातून बिल्डरने अंग काढून घेतले तर त्याला प्रकल्प दुसऱ्याकडे हस्तांतरित करता येणार नाही व स्वत: झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणच प्रकल्पाची उभारणी करेल, असा धोरणात्मक बदलही प्रस्तावित आहे.>पुनर्विकासाचा निर्णय ग्राह्यमोडकळीस आलेल्या सेस इमारतींच्या पुनर्विकासासाठी७० टक्के रहिवाशांऐवजी ५० टक्के रहिवाशांची अनुमती ग्राह्य धरली जाईल, असा महत्त्वाचा बदल गृहनिर्माण धोरणात करण्यात आला होता. एसआरएसाठी मात्र अजूनही ७० टक्के रहिवाशांची अनुमती अनिवार्य आहे. ती बदलून ५० टक्के करण्याचा विचार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.