शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गारठा सुसह्य करण्यासाठी रुपयात ५ लीटर गरम पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 02:14 IST

कडाक्याच्या थंडीच्या दिवसात ग्रामस्थांसाठी गरम पाण्याची सोय व्हावी यासाठी पंढरपूर तालुक्यातील तावशी ग्रामपंचायतीने केवळ एक रुपयात ५ लीटर गरम पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

पंढरपूर (जि़सोलापूर) : कडाक्याच्या थंडीच्या दिवसात ग्रामस्थांसाठी गरम पाण्याची सोय व्हावी यासाठी पंढरपूर तालुक्यातील तावशी ग्रामपंचायतीने केवळ एक रुपयात ५ लीटर गरम पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सोलर वॉटर हीटरवर ही सुविधा असून असा उपक्रम राबविणारी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.तावशी गावाची लोकसंख्या ५ हजार आहे. येथील उपक्रमशील ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा निर्मलग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार मिळाला होता़ या पुरस्कारांतर्गत ग्रामपंचायतीला ५ लाख रुपयांचा निधी मिळाला़ या निधीतील दीड लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने एक हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी ग्रामपंचायतीच्या इमारतीवर ठेवली़ शिवाय इमारतीला सोलर वॉटर हीटर बसविले. या वॉटर हीटर एटीएममध्ये एक रुपयाचे नाणे टाकल्यास ५ लीटर गरम पाणी मिळते. हा साधा उपाय करून ग्रामपंचायतीने गावातील महिलांचा त्रास कमी केला आहे़पहिलाच उपक्रमतावशी ग्रामपंचायतीच्या वतीने एक रुपयामध्ये ५ लीटर व ५ रुपयांमध्ये २५ लीटर गरम पाणी देण्याचा हा जिल्ह्यातील एखाद्या ग्रामपंचायतीने राबविलेला पहिलाच उपक्रम आहे.

टॅग्स :Waterपाणी