शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

कापसासाठी ‘५ एफ’ फॉर्म्यूला!

By admin | Updated: October 7, 2014 23:30 IST

घोटाळेबाज महाराष्ट्राला कुशल महाराष्ट्र बनविणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची खामगाव येथे ग्वाही.

खामगाव (बुलडाणा) : विदर्भ ही कापसाची भूमी असल्याचे सांगत, येथील कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५ -एफ फॉम्र्यूला जाहीर केला. हा फॉम्र्यूला वापरून घोटाळ्यांनी बदनाम झालेल्या राज्याचे कुशल महाराष्ट्रात रूपांतर करण्याची ग्वाही त्यांनी खामगाव येथील जाहीर सभेत दिली.बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी आयोजित सभेत ते बोलत होते. कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा आर्थिक विकास करायचा असेल, तर फार्म (शेती), फायबर (धागा), फॅब्रिक्स (कापड) , फॅशन (रेडीमेड गारमेंट) आणि फॉरेन (निर्यात) हा ५-एफ फॉर्म्यूला राबविणे आवश्यक आहे. जिथे कापूस उत्पादन होते तिथेच धागा बनावा, तिथेच कापड बनावे, त्या कापडापासून रेडीमेड कपडे तयार व्हावे आणि तयार झालेला माल इथूनच विदेशात जावा. या प्रक्रियेत शेतकर्‍यांपासून कारागिरापर्यंत, लहान-मोठय़ा व्यावसायिकांपासून तर व्यापार्‍यांपर्यंत सर्वांनाच उत्पादन मिळेल. भाजप स्पष्ट बहुमत घेऊन सत्तेत आले, तर हे स्वप्न निश्‍चित पूर्ण करू, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. गत पंधरा वर्षे महाराष्ट्रात कुशासन होते. दरवर्षी नवीन घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यांमुळे युवा पिढीचे भविष्य उध्वस्त झाले. भाजपच्या हाती सत्ता आली, तर युवकांना नव्या संधी देणारा स्कील्ड महाराष्ट्र उभा करु, असेही ते म्हणाले. रेल्वे, सिंचन, कृषी या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे विशेष लक्ष आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात यासाठी खास तरतूद केली असून, प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. आजही महाराष्ट्रातील अनेक गावं भारनियमनामुळे १५ ते १८ तास अंधारात असतात, हे आश्‍चर्यच आहे; मात्र येणार्‍या काळात महाराष्ट्र भारनियमनमुक्त असेल. आघाडी सरकारने १५ वर्षे पाप केले. त्यामुळे १५ ऑक्टोबर रोजी या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातून हद्दपार करा, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर आमदार भाऊसाहेब फुंडकर, खा.संजय धोत्रे, भाजपाचे उमदेवार डॉ. संजय कुटे, अँड. आकाश फुं डकर, योगेंद्र गोडे, सुरेशअप्पा खबुतरे, नरहरी गवई, चैनसुख संचेती, प्रकाश भारसाकळे, डॉ. गणेश मांटे, आ. गोवर्धन शर्मा, आ. डॉ. रणजित पाटील, हरिष पिंपळे आदी उपस्थित होते.** आघाडी, युतीचे राज्य संपवाआघाडी आणि युतीच्या कारभारात एकमेकांवर जबाबदार्‍या ढकलण्याचे प्रकार होतात. स्पष्ट बहुमताची सत्ता असली, तर त्या सरकारचा कान पकडता येतो, असे स्पष्ट करून, पाच वर्षानंतर मी माझ्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडेन, असे आश्‍वासन मोदी यांनी दिले.