शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

केंद्राकडे ४५,०७७ कोटी थकले; राज्याच्या बजेटला लागणार कात्री

By अतुल कुलकर्णी | Updated: January 6, 2020 06:56 IST

राज्यात आणि केंद्रात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार आल्याचा मोठा आर्थिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.

अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात आणि केंद्रात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार आल्याचा मोठा आर्थिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. विविध करापोटी केंद्राकडून मिळणारा राज्याचा हिस्सा, आपत्ती व्यवस्थापनाने केलेली मागणी आणि जीएसटीची क्षतीपूर्ती या तीन गोष्टींपोटी केंद्राकडून राज्याला तब्बल ४५,०७७ कोटी रुपये येणे बाकी आहेत. शिवाय, राज्याने आपत्ती निवारणासाठी तिजोरीतून ७,८७४ कोटी रुपये याच आर्थिक वर्षात खर्च केले आहेत. परिणामी, चालू आर्थिक वर्षात राज्य ४३ हजार कोटींच्या तुटीत गेले असल्याने राज्याच्या बजेटला कात्री लागणार आहे.मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने जुलै-आॅगस्ट २०१९ मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी १५ आॅक्टोबर रोजी ७२८८.०५ कोटी रुपये नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता, तसेच आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा ७२०७.७९ कोटींचा प्रस्ताव २२ नोव्हेंबर रोजी पाठविला होता. या दोन्ही प्रस्तावांचे मिळून एकूण १४,४९६ कोटी रुपये राज्याला अद्याप मिळालेले नाहीत.विविध केंद्रीय करापोटी केंद्र सरकारकडे गोळा होणाऱ्या रकमेतून ४२ टक्के हिस्सा राज्याला मिळतो, तर ५८ टक्के हिस्सा केंद्राकडे राहतो. २०१९-२०२० या आर्थिक वर्षात या हिश्श्यापोटी राज्याला ४६,६३०.६६ कोटी रुपये मिळायला हवे होते. त्यापैकी आॅक्टोबर, २०१९ पर्यंत राज्याला फक्त २०,२५४.९२ कोटी रुपये मिळाले आहेत. उर्वरित २६,२३७.७४ कोटी रुपये ३१ मार्च, २०२० पर्यंत मिळायला हवे होते, पण अजूनही मागील दोन महिन्यांचेही पैसे आलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बाब केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. जीएसटीच्या नुकसानीपोटी राज्याला दर दोन महिन्यांनी जी रक्कम मिळते, त्या रकमेला कॉम्पेन्सेशन (क्षतिपूर्ती) म्हणतात. आॅगस्ट ते नोव्हेंबर या काळातील ही रक्कम ८,६१२ कोटी होती. त्यापैकी ४,४०६ कोटी रुपये राज्याला मिळाले. मात्र, अजूनही त्यातील ४,२०६ कोटी रुपये येणे बाकी आहेत. डिसेंबर-जानेवारीचे कॉम्पेन्सेशन येणे बाकी आहे, ज्याच्या रकमेचा यात समावेश नाही. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्र यांच्या सहकार्यातूनच कोणतेही राज्य चालले पाहिजे. मात्र केंद्राने मदतीचा हात आखडता घेतला तर काम करणे अवघड होते. जीएसटी क्षतीपूर्तीचा किंवा आपत्कालीन निधी मिळण्याचा विषय असो केंद्राने वेळेवर पैसे परत दिले पाहिजेत. तसे न झाल्यास राज्यांचे आर्थिक गणित बिघडू शकते.भाजपेतर राज्यांचे नेतृत्व महाराष्ट्राकडे?जीएसटीच्या क्षतीपुर्तीपोटी सर्व राज्यांचे मिळून ६० ते ६२ हजार कोटी केंद्राकडे येणे बाकी आहेत. एवढे पैसे केंद्राकडे नाहीत. केंद्र राज्यांना कॉम्पेन्सेशन देण्यासाठी काही वस्तूंवर सेस गोळा करते. मात्र गोळा होणारा निधी केंद्राला कमी पडत आहे. यावर जीएसटी काऊन्सिलमध्ये चर्चा झाली पण त्यावर ठोस निर्णय झाला नाही. याचा अर्थ केंद्र सरकार राज्यांना कॉम्पेन्सेशन देण्यात हात आखडता घेणार आहे. त्यामुळे या विषयावर महाराष्ट्राने अन्य राज्यांचेही नेतृत्व करावे अशी मागणी होत आहे.

>फडणवीस सरकारच्या योजनांमुळे शिस्त बिघडलीचालू आर्थिक वर्षात राज्याचे बजेट ४३ हजार कोटींच्या तुटीत गेले आहे. ही तूट २७ ते २८ हजार कोटींपर्यंत आणण्यासाठी आमचे प्रयत्न होते, पण याच वर्षी ३१ मार्चपर्यंत, जाहीर केलेल्या कर्जमाफीपोटी आठ ते दहा हजार कोटी लागतील. केंद्राकडून मिळणारा अपुरा निधी आणि फडणवीस सरकारने न झेपणाऱ्या योजना राबविल्याने आर्थिक शिस्त बिघडली आहे. पुन्हा आर्थिक शिस्त लावण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षे लागतील, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले.>असे आहे एकूण येणेआपत्ती व्यवस्थापनाचे दोन प्रस्ताव14,496 कोटीजीएसटीच्या कॉम्पेन्सेशनपोटी4,206 कोटीकेंद्रीय करांपोटी राज्याचा हिस्सा26,375.74 कोटी