शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

४५० लोकप्रतिनिधींची पदे रद्द, दिरंगाई भोवली; कोर्टाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 04:12 IST

कोल्हापूर महापालिकेतील २0 नगरसेवकांची पदेही यामुळे गेली आहेत.

मुंबई : राज्यात गेल्या पाच वर्षांत राखीव जागांवरून स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेल्या परंतु त्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सुमारे ४५० लोकप्रतिनिधींची पदे गुरुवारी रद्द झाली. या सर्व जागा रिकाम्या झाल्याने राज्य निवडणूक आयोगास अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पोटनिवडणुका घ्याव्या लागणार आहेत. कोल्हापूर महापालिकेतील २0 नगरसेवकांची पदेही यामुळे गेली आहेत.महाराष्ट्र ग्राम पंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद व महापालिका कायद्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र असे प्रमाणपत्र मिळाले नसेल, तर ते निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत देण्याची मुभा आहे. ते न दिल्यास त्याचे पद निवडून आल्याच्या दिवसापासून पूर्वलक्षी प्रभावाने आपोआप रद्द झाल्याचे मानण्यात येईल व त्यासाठी प्राधिकाºयाने स्वतंत्र आदेश काढण्याची गरज नाही, अशीही तरतूद कायद्यात आहे.राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींची प्रकरणे गेल्या काही वर्षांत उच्च न्यायालयात आली होती. सहा महिन्यांत प्रमाणपत्र देण्याची बंधनकारकता व ते न दिल्यास पद पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होणे याविषयी दोन खंडपीठांनी परस्पर विरोधी निकाल दिल्याने हे मुद्दे पूर्णपीठाकडे सोपविले गेले होते. न्या. अभय ओक, न्या. एम. एस. सोनक व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने ९ डिसेंबर २०१६ रोजी ९९ पानांचे निकालपत्र देऊन कायद्याची ही तरतूद बंधनकारक असल्याचा व पद आपोआप रद्द होण्याचा निर्वाळा दिला होता.याविरुद्ध विविध लोकप्रतिनिधींनी केलेल्या २९ विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होत्या. न्या. रंजन गोगोई, न्या. नवीन सिन्हा व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने गुरुवारी ही सर्व अपिले फेटाळली व उच्च न्यायालयाचा निकाल कायम केला.या निकालाचा परिणाम जे लोकप्रतिनिधी न्यायालयात गेले होते त्यांच्यापुरता मर्यादित नाही. यात कायद्यामधील तरतुदीचा नेमका अर्थ लावला गेल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या पण सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र न दिलेल्या सर्वांना तो लागू होईल.अशा जागा रिकाम्या झाल्याची अधिकृत सूचना ज्या त्या स्थानिक संस्थेकडून दिली गेली की राज्य निवडणूक आयोगास त्या जागांसाठी पोटनिवडणूका घ्याव्या लागतील. यामुळे अडचणीत आलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या ४५० च्या घरात असावी, असा अंदाज आहे.लेट लतिफांनाही फटकाअनेकांनी सहा महिन्यांची मुदत संपून गेल्यावर जात वैधता प्रमाणपत्रे सादर केली होती. परंतु अशी मुदतीनंतर प्रमाणपत्रे देण्याने पद्द पूर्वलक्षी प्रभावाने आपोआप रद्द होण्याचा कायद्याचा परिणाम नाहीसा होत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे अशा ‘लेट लतिफां’ची पदेही यातून वाचणार नाहीत.

टॅग्स :Politicsराजकारण