शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

४५० लोकप्रतिनिधींची पदे रद्द, दिरंगाई भोवली; कोर्टाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 04:12 IST

कोल्हापूर महापालिकेतील २0 नगरसेवकांची पदेही यामुळे गेली आहेत.

मुंबई : राज्यात गेल्या पाच वर्षांत राखीव जागांवरून स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेल्या परंतु त्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सुमारे ४५० लोकप्रतिनिधींची पदे गुरुवारी रद्द झाली. या सर्व जागा रिकाम्या झाल्याने राज्य निवडणूक आयोगास अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पोटनिवडणुका घ्याव्या लागणार आहेत. कोल्हापूर महापालिकेतील २0 नगरसेवकांची पदेही यामुळे गेली आहेत.महाराष्ट्र ग्राम पंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद व महापालिका कायद्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र असे प्रमाणपत्र मिळाले नसेल, तर ते निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत देण्याची मुभा आहे. ते न दिल्यास त्याचे पद निवडून आल्याच्या दिवसापासून पूर्वलक्षी प्रभावाने आपोआप रद्द झाल्याचे मानण्यात येईल व त्यासाठी प्राधिकाºयाने स्वतंत्र आदेश काढण्याची गरज नाही, अशीही तरतूद कायद्यात आहे.राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींची प्रकरणे गेल्या काही वर्षांत उच्च न्यायालयात आली होती. सहा महिन्यांत प्रमाणपत्र देण्याची बंधनकारकता व ते न दिल्यास पद पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होणे याविषयी दोन खंडपीठांनी परस्पर विरोधी निकाल दिल्याने हे मुद्दे पूर्णपीठाकडे सोपविले गेले होते. न्या. अभय ओक, न्या. एम. एस. सोनक व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने ९ डिसेंबर २०१६ रोजी ९९ पानांचे निकालपत्र देऊन कायद्याची ही तरतूद बंधनकारक असल्याचा व पद आपोआप रद्द होण्याचा निर्वाळा दिला होता.याविरुद्ध विविध लोकप्रतिनिधींनी केलेल्या २९ विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होत्या. न्या. रंजन गोगोई, न्या. नवीन सिन्हा व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने गुरुवारी ही सर्व अपिले फेटाळली व उच्च न्यायालयाचा निकाल कायम केला.या निकालाचा परिणाम जे लोकप्रतिनिधी न्यायालयात गेले होते त्यांच्यापुरता मर्यादित नाही. यात कायद्यामधील तरतुदीचा नेमका अर्थ लावला गेल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या पण सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र न दिलेल्या सर्वांना तो लागू होईल.अशा जागा रिकाम्या झाल्याची अधिकृत सूचना ज्या त्या स्थानिक संस्थेकडून दिली गेली की राज्य निवडणूक आयोगास त्या जागांसाठी पोटनिवडणूका घ्याव्या लागतील. यामुळे अडचणीत आलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या ४५० च्या घरात असावी, असा अंदाज आहे.लेट लतिफांनाही फटकाअनेकांनी सहा महिन्यांची मुदत संपून गेल्यावर जात वैधता प्रमाणपत्रे सादर केली होती. परंतु अशी मुदतीनंतर प्रमाणपत्रे देण्याने पद्द पूर्वलक्षी प्रभावाने आपोआप रद्द होण्याचा कायद्याचा परिणाम नाहीसा होत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे अशा ‘लेट लतिफां’ची पदेही यातून वाचणार नाहीत.

टॅग्स :Politicsराजकारण