शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

टीका करणे हे विरोधकांचे काम; शेतकऱ्यांना ४४ हजार २७८ कोटींची मदत - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:21 IST

सोमवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली.

नागपूर : गेल्या दीड वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ४४ हजार २७८ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वाधिक विक्रमी मदत आहे, हे मी खात्रीने सांगतो, असे म्हणत टीका करणे हे विरोधकांचे काम आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचं कर्तव्य तर आहेच, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारकडे मदत मागावी लागू नये, अशी परिस्थिती निर्माण करणे ही देखील सरकारची जबाबदारी आहे. एवढ्या वर्षांमध्ये आपण अशी परिस्थिती निर्माण करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सोमवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, दिवंगत रानकवी ना. धों. महानोर यांनी म्हटलंच आहे की, या नभाने या भुईला दान द्यावे...आणि या मातीतून चैतन्य गावे... बळीराजाच्या आयुष्यातही असंच चैतन्य यावं, या दिशेने आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमधील अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास १०० टक्के पूर्ण झाले आहेत. ३२ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यांचे पंचनामे १०० टक्के पूर्ण आहेत. परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या ६ जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार बाकी आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

९ लाख ७५ हजार ५९ हेक्टर बाधित क्षेत्र आहे. अवकाळीसाठी अंदाजे २००० कोटींची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. जसजसे पंचनामे होतील, तसतसा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा होईल. किंबहुना आजच मी काही शेतकरी बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात चेकचे वाटप करत आहे. जगाचा पोशिंदा, मायबाप शेतकरी काळ्या मातीत सोनं पिकवतो, म्हणूनच आपल्या सर्वांच्या ताटात दोन वेळचं अन्न पडते. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. काळ्या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे. शेतात पिकं तरारली तर मुखावर येणारं हसू आणि मातीमोल झाली तर येणाऱ्या अश्रूंची मला पूर्ण जाणीव आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करते. पण त्यात अभिमान वाटण्याऐवजी, इतकी वर्ष आपण शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीविना स्वतःच्या पायावर का उभं करू शकलो नाही, याचा विचार आपण सर्वांनीच केला पाहिजे, असे मला वाटते. आमचे सरकार त्या दिशेने प्रयत्न करत आहे. राज्यात सत्तेत आल्यापासून गेली दीड वर्ष ऊन-पावसाच्या तडाख्यात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्या समस्या समजून घेत आहोत. त्यावर उपाययोजना करत आहोत आणि करत राहू. गेल्या काही वर्षांपासून निसर्गचक्र बदललं आहे. ‘अल निनो इफेक्ट’ असेल वा ‘ग्लोबल वॉर्मिंग’, यामुळे अवेळी येणाऱ्या पावसाचं प्रमाणही वाढलं आहे. क्लायमेट चेंजमुळे कमी दिवसांत भरपूर पाऊस पडतो, हे ही आपण गेली काही वर्षं बघत आहोत. एकीकडे अतिवृष्टी, तर दुसऱ्या भागात दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस अशी स्थिती गेली काही वर्षं सातत्याने निर्माण होत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता १७५७ कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय झाला आहे, त्यापैकी ३०० कोटीपेक्षा जास्तीचे वाटप देखील झाले आहे. मनरेगामध्ये कांदा चाळी, बांबू, शेडनेट यांचा समावेश करण्यास सांगितले आहे. गोडाऊन देखील मनरेगामध्ये घेऊ शकतो का? याची चाचपणी करतोय. काही सलग गावांचं क्लस्टर बनवून त्यांच्यासाठी गोडाऊन उभारण्याचा विचार सरकार करतंय, जेणेकरून कापणी झालेल्या पिकांचं अवकाळी पाऊस किंवा गारपिटीमुळे नुकसान होणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

यंदाचा दुष्काळ आणि अवकाळीची मदत ४ हजार ४३८ कोटी रुपये इतकी आहे. अशारितीने मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून एकूण मदतनिधी १४ हजार ८९१ कोटी रुपये इतका आहे. शेतकऱ्यांकरिता ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ या वर्षी सुरू केली. केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी तीन टप्प्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा केले जातात. त्यात राज्य शासनाने आणखी ६ हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता ५ हजार ७०० कोटी इतक्या रकमेची तरतूद केली आहे. ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर राज्याच्या हिश्याचा पहिला टप्पा म्हणून १ हजार ७२० कोटी रुपये जमा देखील झाले आहेत. २०२३ च्या खरीप हंगामात राज्यातील १ कोटी ७० लाख व रब्बी हंगामात ६६ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनFarmerशेतकरी