शहरं
Join us  
Trending Stories
1
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
2
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
3
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
6
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
7
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
8
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
9
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
10
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
11
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
12
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
13
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
14
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
15
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
16
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
17
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
18
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
19
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
20
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा

सोलापूरमध्ये ४८ हजार शेतकर्‍यांना ४३७ कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: June 28, 2016 19:58 IST

यावर्षी जिल्ह्यातील ४८ हजार शेतकर्‍यांना ४३७ कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकेतून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी पत्रकारांना दिली. ३0 जूननंतर

'जलयुक्त'चे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक-आषाढीवारी अधिक सुखकर करणार

सोलापूर : यावर्षी जिल्ह्यातील ४८ हजार शेतकर्‍यांना ४३७ कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकेतून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी पत्रकारांना दिली. ३0 जूननंतर कर्जांचे पुनर्गठन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला त्यावेळी जलयुक्त शिवार अभियान, कर्जाचे पुनर्गठन, मुख्यमंत्री पेयजल योजना, मुख्यमंत्री सडक योजना, बेटी बचाव बेटी पढाओ आदी विविध योजनांचा आढावा घेतला. कर्जाचे पुनर्गठन आपण ३0 जूननंतर करतो असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. सध्या ४८ हजार शेतकर्‍यांना ४३७ कोटी कर्ज वाटले असून ४४ टक्के कर्ज डीसीसी बँकेने दिले आहे. पाऊस झाल्यानंतर पुन्हा कर्ज देण्याचे प्रमाण वाढले असे ते म्हणाले. ३१ मार्चपर्यंत ८0 टक्के शेतकर्‍यांना कर्ज देण्याचे नियोजन आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे हिरवळ निर्माण झाली; मात्र भूजल पातळी वाढण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची गरज असून आम्ही आशावादी आहोत असे ते म्हणाले. मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी १९१६ शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले असून १५८२ तळ्यांची वर्कऑर्डर दिली आहे. ३३३ शेततळी पूर्ण झाली आहेत तर ८४१ कामे पूर्ण झाली आहेत १0८ लोकांना याचे पैसे देखील दिल्याचे ते म्हणाले.जलयुक्त शिवार अभियानातून गतवर्षी २८0 गावे होती त्यापैकी २५२ गावांत १00 टक्के कामे पूर्ण झाली असून, ३0 जूनपर्यंत उर्वरित १२ गावातील कामे होतील. यंदाच्या वर्षी २६५ गावांमध्ये विविध कामे गतीने सुरू असून मुख्यमंत्र्यांनी देखील सोलापूरच्या कामाचे सोमवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये कौतुक केले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा इतर शासकीय बँकेपेक्षा शेतकर्‍यांशी जास्त संबंध आहे; मात्र डीसीसी बँकेकडे शेतकर्‍यांना देण्यासाठी भांडवल नाही. त्यामुळे शासनाने डीसीसीला भांडवल द्यावे किंवा जिल्ह्यातील शासकीय बँकांकडून डीसीसी बँकेला शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी भांडवल द्यावे याबाबत आपण शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून शासन याबाबत निर्णय घेईल असे जिल्हाधिकारी रणजित कुमार म्हणाले. शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे ५४ कोटी जिल्ह्याला मंजूर झाले. यातील ४0 कोटी डीसीसी बँकेत जमा झाले; मात्र त्यांनी शेतकर्‍यांकडून काही रक्कम कपात केल्याचे समजले याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागविल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.