शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
2
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
3
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
4
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
5
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
6
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
7
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
8
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
9
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
10
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
11
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
12
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
13
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
14
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
15
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
16
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
17
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
19
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
20
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरमध्ये ४८ हजार शेतकर्‍यांना ४३७ कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: June 28, 2016 19:58 IST

यावर्षी जिल्ह्यातील ४८ हजार शेतकर्‍यांना ४३७ कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकेतून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी पत्रकारांना दिली. ३0 जूननंतर

'जलयुक्त'चे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक-आषाढीवारी अधिक सुखकर करणार

सोलापूर : यावर्षी जिल्ह्यातील ४८ हजार शेतकर्‍यांना ४३७ कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकेतून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी पत्रकारांना दिली. ३0 जूननंतर कर्जांचे पुनर्गठन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला त्यावेळी जलयुक्त शिवार अभियान, कर्जाचे पुनर्गठन, मुख्यमंत्री पेयजल योजना, मुख्यमंत्री सडक योजना, बेटी बचाव बेटी पढाओ आदी विविध योजनांचा आढावा घेतला. कर्जाचे पुनर्गठन आपण ३0 जूननंतर करतो असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. सध्या ४८ हजार शेतकर्‍यांना ४३७ कोटी कर्ज वाटले असून ४४ टक्के कर्ज डीसीसी बँकेने दिले आहे. पाऊस झाल्यानंतर पुन्हा कर्ज देण्याचे प्रमाण वाढले असे ते म्हणाले. ३१ मार्चपर्यंत ८0 टक्के शेतकर्‍यांना कर्ज देण्याचे नियोजन आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे हिरवळ निर्माण झाली; मात्र भूजल पातळी वाढण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची गरज असून आम्ही आशावादी आहोत असे ते म्हणाले. मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी १९१६ शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले असून १५८२ तळ्यांची वर्कऑर्डर दिली आहे. ३३३ शेततळी पूर्ण झाली आहेत तर ८४१ कामे पूर्ण झाली आहेत १0८ लोकांना याचे पैसे देखील दिल्याचे ते म्हणाले.जलयुक्त शिवार अभियानातून गतवर्षी २८0 गावे होती त्यापैकी २५२ गावांत १00 टक्के कामे पूर्ण झाली असून, ३0 जूनपर्यंत उर्वरित १२ गावातील कामे होतील. यंदाच्या वर्षी २६५ गावांमध्ये विविध कामे गतीने सुरू असून मुख्यमंत्र्यांनी देखील सोलापूरच्या कामाचे सोमवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये कौतुक केले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा इतर शासकीय बँकेपेक्षा शेतकर्‍यांशी जास्त संबंध आहे; मात्र डीसीसी बँकेकडे शेतकर्‍यांना देण्यासाठी भांडवल नाही. त्यामुळे शासनाने डीसीसीला भांडवल द्यावे किंवा जिल्ह्यातील शासकीय बँकांकडून डीसीसी बँकेला शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी भांडवल द्यावे याबाबत आपण शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून शासन याबाबत निर्णय घेईल असे जिल्हाधिकारी रणजित कुमार म्हणाले. शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे ५४ कोटी जिल्ह्याला मंजूर झाले. यातील ४0 कोटी डीसीसी बँकेत जमा झाले; मात्र त्यांनी शेतकर्‍यांकडून काही रक्कम कपात केल्याचे समजले याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागविल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.