शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरमध्ये ४८ हजार शेतकर्‍यांना ४३७ कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: June 28, 2016 19:58 IST

यावर्षी जिल्ह्यातील ४८ हजार शेतकर्‍यांना ४३७ कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकेतून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी पत्रकारांना दिली. ३0 जूननंतर

'जलयुक्त'चे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक-आषाढीवारी अधिक सुखकर करणार

सोलापूर : यावर्षी जिल्ह्यातील ४८ हजार शेतकर्‍यांना ४३७ कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकेतून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी पत्रकारांना दिली. ३0 जूननंतर कर्जांचे पुनर्गठन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला त्यावेळी जलयुक्त शिवार अभियान, कर्जाचे पुनर्गठन, मुख्यमंत्री पेयजल योजना, मुख्यमंत्री सडक योजना, बेटी बचाव बेटी पढाओ आदी विविध योजनांचा आढावा घेतला. कर्जाचे पुनर्गठन आपण ३0 जूननंतर करतो असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. सध्या ४८ हजार शेतकर्‍यांना ४३७ कोटी कर्ज वाटले असून ४४ टक्के कर्ज डीसीसी बँकेने दिले आहे. पाऊस झाल्यानंतर पुन्हा कर्ज देण्याचे प्रमाण वाढले असे ते म्हणाले. ३१ मार्चपर्यंत ८0 टक्के शेतकर्‍यांना कर्ज देण्याचे नियोजन आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे हिरवळ निर्माण झाली; मात्र भूजल पातळी वाढण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची गरज असून आम्ही आशावादी आहोत असे ते म्हणाले. मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी १९१६ शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले असून १५८२ तळ्यांची वर्कऑर्डर दिली आहे. ३३३ शेततळी पूर्ण झाली आहेत तर ८४१ कामे पूर्ण झाली आहेत १0८ लोकांना याचे पैसे देखील दिल्याचे ते म्हणाले.जलयुक्त शिवार अभियानातून गतवर्षी २८0 गावे होती त्यापैकी २५२ गावांत १00 टक्के कामे पूर्ण झाली असून, ३0 जूनपर्यंत उर्वरित १२ गावातील कामे होतील. यंदाच्या वर्षी २६५ गावांमध्ये विविध कामे गतीने सुरू असून मुख्यमंत्र्यांनी देखील सोलापूरच्या कामाचे सोमवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये कौतुक केले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा इतर शासकीय बँकेपेक्षा शेतकर्‍यांशी जास्त संबंध आहे; मात्र डीसीसी बँकेकडे शेतकर्‍यांना देण्यासाठी भांडवल नाही. त्यामुळे शासनाने डीसीसीला भांडवल द्यावे किंवा जिल्ह्यातील शासकीय बँकांकडून डीसीसी बँकेला शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी भांडवल द्यावे याबाबत आपण शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून शासन याबाबत निर्णय घेईल असे जिल्हाधिकारी रणजित कुमार म्हणाले. शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे ५४ कोटी जिल्ह्याला मंजूर झाले. यातील ४0 कोटी डीसीसी बँकेत जमा झाले; मात्र त्यांनी शेतकर्‍यांकडून काही रक्कम कपात केल्याचे समजले याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागविल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.