शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

जानेवारी-फेब्रुवारी दोन महिन्यात राज्यात 435 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीनंतरची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 13:31 IST

कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे.

मुंबई- जून महिन्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती.  कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यात राज्यामध्ये एकुण 435 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी याकाळात एकुण 414 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. एकंदरीतच गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला आहे.  अधिकृत आकडेवारीनुसार मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षाच्या सुरूवातीच्या दोन महिन्यातील आकडेवारी पाहता आत्महत्येच्या संख्येत वाढ झाली आहे. 

मराठवाड्यातील दुष्काळी भागात यावर्षी 152 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. गेल्यावर्षी ही संख्या 134 होती. म्हणजेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येच्या 72 घटना यावर्षी घडल्या. गेल्यावर्षी 47 घटना होत्या. म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांमध्ये 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

नागपूरमध्ये सर्वाधीक शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात 199 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भ व मराठवाडा दोन्ही कापूस उत्पादक प्रदेश आहेत.