शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

राज्यात अभियांत्रिकीच्या ४३ टक्के जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 01:06 IST

मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्यामुळे मागील प्रवेशांप्रमाणेच काहीशी स्थिती यंदा पाहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी शिक्षणाचा घसरलेला दर्जा तसेच काही विशिष्ट शाखांमध्ये नोकऱ्यांची संधी कमी झाल्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळण्याचे प्रमाण यंदाही कमीच आहे. राज्यातील अभियांत्रिकी पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया संपली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने पुरविलेल्या माहितीनुसार यंदा पदवी प्रवेशाच्या ५६ हजार ४८८,पदविका प्रवेशाच्या ७१ हजार ९५४ तर पदव्युत्तर प्रवेशाच्या ८०९९ जागा रिक्त आहेत. यंदा प्रवेशाच्या एकूण जागांमध्ये घट करण्यात आल्याने यंदाच्या प्रवेशाची स्थिती मागील वर्षीप्रमाणेच आहे.केंद्र सरकारने यंदा लागू केलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास संवर्ग (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अत्यल्प विद्यार्र्थ्यांनी घेतला आहे. यामुळे इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्ट आदी अभ्यासक्रमांच्या शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत. या कोट्यातील अभियांत्रिकी पदवीच्या ८२ टक्के तर पदव्युत्तर अभियांत्रिकीच्या ९४ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्यामुळे मागील प्रवेशांप्रमाणेच काहीशी स्थिती यंदा पाहायला मिळत आहे.अभियांत्रिकीच्या पदवीच्या शासकीय संस्थामधील ९८ शासकीय अनुदानित संस्थांमधील ३२ तर विनाअनुदानित संस्थांमधील ८१५० अशा एकूण ८ हजार ३७२ जागा रिक्त राहिल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गासाठी यंदा १० हजार २४९ जागा उपलब्ध होत्या, त्यातील केवळ १८७७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.हीच परिस्थिती अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर प्रवेशाची आहे. पदव्युत्तर अभियांत्रिकीच्या यंदा आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गासाठी एकूण ११६० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी केवळ ६९ जागांवर प्रवेश निश्चित होऊन १०९१ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामधील शाकीय संस्थांमधील रिक्त जागांची संख्या ६१, शासकीय अनुदानित संस्थांमधील रिक्त जागांची संख्या ६८ तर विनाअनुदानित संस्थांमधील रिक्त जागांची संख्या ९२३ आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र