शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

राज्यात अभियांत्रिकीच्या ४३ टक्के जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 01:06 IST

मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्यामुळे मागील प्रवेशांप्रमाणेच काहीशी स्थिती यंदा पाहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी शिक्षणाचा घसरलेला दर्जा तसेच काही विशिष्ट शाखांमध्ये नोकऱ्यांची संधी कमी झाल्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळण्याचे प्रमाण यंदाही कमीच आहे. राज्यातील अभियांत्रिकी पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया संपली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने पुरविलेल्या माहितीनुसार यंदा पदवी प्रवेशाच्या ५६ हजार ४८८,पदविका प्रवेशाच्या ७१ हजार ९५४ तर पदव्युत्तर प्रवेशाच्या ८०९९ जागा रिक्त आहेत. यंदा प्रवेशाच्या एकूण जागांमध्ये घट करण्यात आल्याने यंदाच्या प्रवेशाची स्थिती मागील वर्षीप्रमाणेच आहे.केंद्र सरकारने यंदा लागू केलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास संवर्ग (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अत्यल्प विद्यार्र्थ्यांनी घेतला आहे. यामुळे इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्ट आदी अभ्यासक्रमांच्या शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत. या कोट्यातील अभियांत्रिकी पदवीच्या ८२ टक्के तर पदव्युत्तर अभियांत्रिकीच्या ९४ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्यामुळे मागील प्रवेशांप्रमाणेच काहीशी स्थिती यंदा पाहायला मिळत आहे.अभियांत्रिकीच्या पदवीच्या शासकीय संस्थामधील ९८ शासकीय अनुदानित संस्थांमधील ३२ तर विनाअनुदानित संस्थांमधील ८१५० अशा एकूण ८ हजार ३७२ जागा रिक्त राहिल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गासाठी यंदा १० हजार २४९ जागा उपलब्ध होत्या, त्यातील केवळ १८७७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.हीच परिस्थिती अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर प्रवेशाची आहे. पदव्युत्तर अभियांत्रिकीच्या यंदा आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गासाठी एकूण ११६० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी केवळ ६९ जागांवर प्रवेश निश्चित होऊन १०९१ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामधील शाकीय संस्थांमधील रिक्त जागांची संख्या ६१, शासकीय अनुदानित संस्थांमधील रिक्त जागांची संख्या ६८ तर विनाअनुदानित संस्थांमधील रिक्त जागांची संख्या ९२३ आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र