शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

राज्यातील रुग्णालयात ४० टक्के औषधांचा शून्य साठा; आवश्यक औषधांचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 06:01 IST

आरोग्यसेवा संरक्षण आणि हक्कांसाठी आघाडी उभारणार राज्यभर लढा

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात राज्याच्या ६ जिल्हा रुग्णालयांमध्ये औषध व साहित्य यांच्या उपलब्धतेबद्दल जन आरोग्य अभियानाद्वारे केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मांडला गेला. यात आवश्यक औषधांपैकी ४० टक्के औषधांचा साठा शून्य दिसून आला, तर पुरेसा साठा फक्त ११.५ टक्के औषधांच्या बाबतीत आहे, असे धक्कादायक वास्तव समोर आले. राज्यातील आवश्यक औषधांचा प्रचंड दुष्काळ लक्षात घेता, सरकारी दवाखान्यांतील हा तुटवडा दूर करण्यासाठी औषध खरेदी व वितरण प्रणालीत तामिळनाडू, राजस्थान या राज्यांच्या धर्तीवर आमूलाग्र बदल करावे, असे प्रतिपादन आरोग्यसेवा संरक्षण व हक्कांसाठी स्थापन केलेल्या आघाडीच्या एकदिवसीय परिषदेत सोमवारी तज्ज्ञांनी मांडले.

राज्यातील निरनिराळ्या आरोग्य संघटनांनी आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी मिळून स्थापन केलेल्या ‘आरोग्य सेवा संरक्षण आणि हक्कांसाठी आघाडी’च्या वतीने आरोग्य हक्क निर्धार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडली. जन आरोग्य अभियानाच्या डॉ. अभिजीत मोरे यांनी यावेळी आघाडीची भूमिका मांडली.

राज्यात हमीच्या आरोग्यसेवांचा कायदा होण्याची गरज व्यक्त केली. राज्यातील संघटनांचे विविध जिल्ह्यांतून आलेले २०० कार्यकर्ते परिषदेमध्ये सामील झाले होते. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे डॉ. सुंदररमण यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेतील औषधांचा दुष्काळ त्वरित संपविण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी तामिळनाडू राज्याचे मॉडेल अवलंबले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे विश्वास उटगी यांनी या आघाडीचे स्वागत करत, येत्या काळात आरोग्याच्या मुद्द्यावर मोठे जनआंदोलन उभे राहण्याची गरज व्यक्त केली.

परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनंत फडके यांनी सर्वांसाठी आरोग्यसेवा शक्य आहे आणि अनेक देशांनी ते करून दाखविले आहे. देशातही ते शक्य आहे. गरज आहे, ती राजकीय इच्छाशक्तीची असे मनोगत व्यक्त केले.सरकारचा प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनराज्यात आघाडीच्या मजबुतीसाठी भविष्यात जिल्हावार बैठका आयोजित करण्यात येतील, असे परिषदेत ठरविण्यात आले. राज्य शासनाशी संवाद साधण्याचा आणि त्यांना आघाडीच्या मागण्यांबाबत अवगत करण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्य सरकारने याला प्रतिसाद न दिल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णयही या परिषदेत घेण्यात आला.

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधं