शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आवाजाने सजविले ४0 प्रजासत्ताकदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:19 IST

लोकांच्या हृदयाला भिडणारी शब्दफेक... आवाजातील भारदस्तपणा... शब्दांना एखाद्या नदीप्रमाणे खळखळत प्रवाहीत करण्याचे कौशल्य... अशा अनेक वैशिष्ट्यांनी सजलेल्या सांगलीतील एका सुंदर आवाजाने एक, दोन नव्हे, तर तब्बल ४0 प्रजासत्ताक दिनांच्या सोहळ्यांना सजविले आहे.

अंजर अथणीकर सांगली : लोकांच्या हृदयाला भिडणारी शब्दफेक... आवाजातील भारदस्तपणा... शब्दांना एखाद्या नदीप्रमाणे खळखळत प्रवाहीत करण्याचे कौशल्य... अशा अनेक वैशिष्ट्यांनी सजलेल्या सांगलीतील एका सुंदर आवाजाने एक, दोन नव्हे, तर तब्बल ४0 प्रजासत्ताक दिनांच्या सोहळ्यांना सजविले आहे. सूत्रसंचालनाची चाळिशी पूर्ण करणाºया श्रीमंत आवाजाचा अत्यंत साधा माणूस म्हणजे विजयदादा कडणे.राष्टÑीय भावनेने इतकी वर्षे अखंडित सेवा देणारे ते एकमेव निवेदक ठरले आहेत. या सोहळ्याची वेळ त्यांनी कधीही चुकवलेली नाही. प्रजासत्ताक दिनावेळी ते ना कधी आजारी पडले, ना कधी त्यांचा आवाज बसला, हे विशेष!‘सांगलीचा आवाज’ म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिध्द आहेत. ‘दादा’ म्हणून ते ओळखले जातात. आज सत्तरीत पोहोचलेले कडणे गेली ४५ वर्षे सूत्रसंचालकाचे काम करत आहेत. दैवज्ञ समाजाचे काम करीत असताना त्यांचा खणखणीत आवाज राजकीय नेत्यांच्या लक्षात आला. त्यानंतर ते सूत्रसंचालन करू लागले. यासाठी त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही किंवा आवाजासाठी कधी पथ्यपाणी पाळले नाही. निमंत्रणाच्या ठिकाणी सायकलवरून ते वेळेआधीच तासभर पोहोचतात.प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन आणि महाराष्टÑदिन हे तीन सोहळे ते अगदी राष्टÑप्रेरणेने करतात. यासाठी कधीही मानधनाची अपेक्षा ठेवत नाहीत. ही सेवा देणे म्हणजे राष्टÑीय कर्तव्य समजतात. ४० वर्षापूर्वी ते एका कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी त्यांना ऐकले. त्यानंतर गेली ४० वर्षे त्यांना प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी निमंत्रण मिळत आहे.राष्टÑपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम...विजयदादांनी तत्कालीन राष्टÑपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, व्ही. पी. सिंग ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या सभांचे सूत्रसंचालन केले आहे. त्याचबरोबर वसंतराव नाईक यांच्यापासून सर्वच मुख्यमंत्र्यांच्या सभांसाठीचेही सूत्रसंचालन केले आहे. दिवसामध्ये सहा, सहा कार्यक्रम पार पाडण्याची कसरत त्यांनी केली आहे.विजयदादा गेली ४० वर्षे प्रजासत्ताक दिनाचे सूत्रसंचालन करीत असताना, कार्यक्रमात कधीही अनियमितता झालेली नाही. संबंधित मंत्री, अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींकडून एक मिनिटही ध्वजारोहणास विलंब झालेला नाही. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे कार्यक्रमही त्यांनी पार पाडले आहेत. कार्यक्रम तीन-तीन तास लांबले आहेत. मात्र सुरुवात वेळेत झाली आहे. राष्टÑशिष्टाचाराचा भंग कधीही झालेला नाही. मात्र शासकीय सोहळे पार पाडताना दादा थोडेसे तणावात असतात.

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८