शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

दोन वर्षांत गोरगरिबांच्या उपचारांवर ३८८ कोटी खर्च

By admin | Updated: July 16, 2017 01:24 IST

‘सरकारी काम, सहा महिने थांब’ अशी म्हण आहे. सेवाभावी कामांनाही विलंब लागतो वा काम न होण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली जाते, पण चांगले काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ अशी म्हण आहे. सेवाभावी कामांनाही विलंब लागतो वा काम न होण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली जाते, पण चांगले काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असेल, तर सरकारी भितींनाही कसा ओलावा येतो, त्याचे अनोखे रूप पाहायला मंत्रालयातला सातवा मजला गाठायला हवा. गेल्या दोन वर्षांत सातव्या मजल्यावरून राज्यातील हजारो रुग्णांना तब्बल ३८८ कोटी रुपयांचे उपचार मोफत मिळाले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १५ हजार रुग्णांना १५0 कोटी मिळाले. औषधोपचारासाठी सिद्धिविनायक ट्रस्ट, साईबाबा ट्रस्ट यांच्याकडून पाच पंचवीस हजारांच्या मदतीसाठी धडपड चालू असते. मुख्यमंत्री निधीतून मदत मिळेलच, याची खात्री नसायची. पूर्वी वर्षाला सुमारे ४ कोटींची मदत मिळत असे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊ न ओमप्रकाश शेटे यांची खासगी ओएसडी म्हणून नेमणूक केली. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी नियमांचे अडथळे दूर करत गरिबांना उपचारासाठी सहज लाखभर रुपये मिळू लागले. वर्षाला १५० कोटींपर्यंतचा निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून खुला झाला आहे. धर्मादाय आयुक्तालयामार्फत ५० हजारांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न व १ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना मोफत, सवलतीत उपचारासाठी निधी दिला गेला. शेटे यांनी ४५० पेक्षा अधिक धर्मादाय रुग्णालयांना २० टक्के राखीव खाटा गरिबांसाठी ठेवण्यास भाग पाडले. परिणामी, २०१५ मध्ये या रुग्णालयांतर्फे १७९ कोटींचे, २०१६ मध्ये २०९ कोटी खर्चाचे उपचार विनाशुल्क झाले. अशा रुग्णांची संख्या पाच लाखांच्या घरात आहे. आधी मुख्यमंत्री निधीतून कमाल २५ हजारांची मदत मिळत असे. १३ आॅगस्ट २०१५ पासून ती २ लाखांपर्यंत वाढविली. जानेवारी २०१६ मध्ये हा आकडा ३ लाखांपर्यंत केला. शिवाय मंत्री, आमदार त्यांच्या निधीतून आरोग्य शिबिर, टूडी ईकोसारखे मशिन मिळवून देण्याचे कामही हा विभाग करत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची अनास्थाप्राथमिक आरोग्य केंद्रांची व जिल्हा रुग्णालयांची अनास्था या निमित्ताने समोर येत आहे. ही केंद्रे सक्षम असती व तेथे योग्य उपचार मिळाले असते, तर मुख्यमंत्री निधीवरील भार कमी झाला असता, असाही दृष्टिकोन यामागे आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी किती प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या, याची आकडेवारी मागितल्यास विदारक चित्र समोर येईल.