शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

पावसाळापूर्व उपायांवर ३२१ कोटींचा खर्च

By admin | Published: May 31, 2016 6:15 AM

प्रत्येक वर्षी कोकण रेल्वेकडून पावसाळापूर्व सुरक्षेच्या उपाययोजना रेल्वेमार्गांवर केल्या जातात. तरीही कोकण रेल्वेला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो आणि कोकण रेल्वे विस्कळीत होते.

मुंबई : प्रत्येक वर्षी कोकण रेल्वेकडून पावसाळापूर्व सुरक्षेच्या उपाययोजना रेल्वेमार्गांवर केल्या जातात. तरीही कोकण रेल्वेला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो आणि कोकण रेल्वे विस्कळीत होते. गेल्या १७ वर्षांत कोकण रेल्वेने पावसाळापूर्व सुरक्षा उपाययोजनांवर ३२१ कोटी रुपये खर्च केल्याचे कोकण रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यास यंदाही कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. जवळपास ९५0 कर्मचारी तैनात करण्याबरोबरच मुसळधार पावसात कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ट्रेनना ताशी ४0 किमीची वेगमर्यादा देण्यात आली आहे. कोकण रेल्वेमार्गावर प्रत्येक वर्षी दरड कोसळणे, माती खचणे, पाणी साचण्याच्या घटना घडतात आणि मोठा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसतो. पोमेंडी, निवसर, अडवलीसारखी ठिकाणे तर कोकण रेल्वेसाठी डोकेदुखीच ठरली आहे. या ठिकाणी तर भूसख्खलनामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र गेल्या चार वर्षांत कोणतीही दुर्घटना घडली नसून उपाययोजनांमुळे पावसाळ्यात सुरळीतपणे ट्रेन धावल्याचे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळापूर्व सुरक्षा उपाययोजनेसाठी कोकण रेल्वेमार्गावर यंदा ४ कोटी ५८ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तर २0१४-१५मध्ये हाच खर्च ८ कोटी १७ लाख रुपये एवढा होता. मागील १७ वर्षातील खर्च ३२१ कोटी ७0 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.