शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

राज्यात ३२०० कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2016 19:44 IST

सध्या राज्यभरातील २४ टक्के वीज ग्राहकांकडे सुमारे ३ हजार २०० कोटींची थकबाकी आहे.

ऑनलाइन लोकमत  
नागपूर, दि. १ -  सध्या राज्यभरातील २४ टक्के वीज ग्राहकांकडे सुमारे ३ हजार २०० कोटींची थकबाकी असून, यामुळे या सर्व ग्राहकांकडील वीज पुरवठा कायमचा खंडीत करण्यात आला आहे. अशा या सर्व ग्राहकांसाठी महावितरणतर्फे येत्या १ नोव्हेंबरपासून ‘अभय योजना’ सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली. 
विशेष म्हणजे, या सर्व ग्राहकांकडील वीज पुरवठा कायमचा खंडीत करण्यात आला आहे. मात्र तरी ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने वीज घेत आहे. यामुळे महावितरणला फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय या सर्व ग्राहकांकडे ३ हजार २०० कोटींची थकबाकी अडून पडली आहे. या योजनेच्या माध्यमातून ती थकबाकी वसूल करून, या सर्व वीज ग्राहकांकडील पुन्हा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी ही योजना असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 
या योजनेत थकबाकीदारांकडील ७५ ते १०० टक्के व्याजाची रक्कम आणि १०० टक्के विलंब आकार माफ होणार आहे. तसेच एक महिन्यात मूळ थकबाकीचा भरणा केल्यास त्यातील ५ टक्के रक्कम ही परत दिली जाणार आहे. एकूण ३ हजार २०० कोटींच्या थकबाकीमध्ये २ हजार ६४९ कोटी रूपयांची मूळ थकबाकी असून, त्यात ५४६ कोटी रूपयांच्या व्याजाचा समावेश आहे. 
शिवाय यामध्ये घरगुती ग्राहकांकडे १ हजार ८६७ कोटी, लघुदाब वाणिज्यिक ग्राहकांकडे ४३६ कोटी, लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडे २१० कोटी, पथदिवा योजनांकडे ६ कोटी, शितगृह ग्राहकांकडे ६ कोटी, तात्पुरती जोडणी घेतलेल्या ग्राहकांकडे २४ कोटी, सार्वजनिक सेवांकडे १२ कोटी, जाहिराती व होर्डिंग्जकडे २ कोटी, पावरलुम ग्राहकांकडे २४ कोटी आणि उच्चदाब ग्राहकांकडे ६०८ कोटींची थकबाकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.