शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

राज्यात ३२०० कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2016 19:44 IST

सध्या राज्यभरातील २४ टक्के वीज ग्राहकांकडे सुमारे ३ हजार २०० कोटींची थकबाकी आहे.

ऑनलाइन लोकमत  
नागपूर, दि. १ -  सध्या राज्यभरातील २४ टक्के वीज ग्राहकांकडे सुमारे ३ हजार २०० कोटींची थकबाकी असून, यामुळे या सर्व ग्राहकांकडील वीज पुरवठा कायमचा खंडीत करण्यात आला आहे. अशा या सर्व ग्राहकांसाठी महावितरणतर्फे येत्या १ नोव्हेंबरपासून ‘अभय योजना’ सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली. 
विशेष म्हणजे, या सर्व ग्राहकांकडील वीज पुरवठा कायमचा खंडीत करण्यात आला आहे. मात्र तरी ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने वीज घेत आहे. यामुळे महावितरणला फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय या सर्व ग्राहकांकडे ३ हजार २०० कोटींची थकबाकी अडून पडली आहे. या योजनेच्या माध्यमातून ती थकबाकी वसूल करून, या सर्व वीज ग्राहकांकडील पुन्हा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी ही योजना असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 
या योजनेत थकबाकीदारांकडील ७५ ते १०० टक्के व्याजाची रक्कम आणि १०० टक्के विलंब आकार माफ होणार आहे. तसेच एक महिन्यात मूळ थकबाकीचा भरणा केल्यास त्यातील ५ टक्के रक्कम ही परत दिली जाणार आहे. एकूण ३ हजार २०० कोटींच्या थकबाकीमध्ये २ हजार ६४९ कोटी रूपयांची मूळ थकबाकी असून, त्यात ५४६ कोटी रूपयांच्या व्याजाचा समावेश आहे. 
शिवाय यामध्ये घरगुती ग्राहकांकडे १ हजार ८६७ कोटी, लघुदाब वाणिज्यिक ग्राहकांकडे ४३६ कोटी, लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडे २१० कोटी, पथदिवा योजनांकडे ६ कोटी, शितगृह ग्राहकांकडे ६ कोटी, तात्पुरती जोडणी घेतलेल्या ग्राहकांकडे २४ कोटी, सार्वजनिक सेवांकडे १२ कोटी, जाहिराती व होर्डिंग्जकडे २ कोटी, पावरलुम ग्राहकांकडे २४ कोटी आणि उच्चदाब ग्राहकांकडे ६०८ कोटींची थकबाकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.