शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

३२ हजार विद्यार्थी देणार बारावी परीक्षा

By admin | Updated: February 19, 2015 23:47 IST

कोकण विभाग : वाणिज्य शाखेसाठी सर्वाधिक परीक्षार्थी

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा शनिवार दि. २१ पासून सुरु होत आहे. कोकण विभागातून एकूण ३२ हजार ८०९ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. विद्यार्थी संख्येमध्ये रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी आहे तर शाखांमध्ये वाणिज्य शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी असल्याचे दिसून येत आहे.बारावीची परीक्षा शनिवारपासून घेण्यात येणार आहे. यासाठीची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडून याबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे. कोकण विभागीय शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून १२वीच्या परीक्षेला ३२ हजार ८०९ विद्यार्थी बसणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून २० हजार ८०७ विद्यार्थी बसत आहेत. जिल्ह्यामध्ये १२ परिरक्षक केंद्र कार्यान्वित करण्यात करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण २७ परीक्षा केंद्रावर हे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून ११ हजार ९५४ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यासाठी जिल्ह्यात ८ परिरक्षक केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आल्याची माहिती कोकण विभागीय परीक्षा मंडळातर्फे देण्यात आली.शाखानिहाय विद्यार्थी संख्या लक्षात घेता वाणिज्य शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेला बसल्याचे स्पष्ट होते. कला शाखेमधून रत्नागिरी जिल्ह्यातून ६ हजार ५४४ तर सिंधुदुर्गमधून ३ हजार ४०६ विद्यार्थी बसणार आहेत. वाणिज्य शाखेमधून रत्नागिरी जिल्ह्यातून ८ हजार १९३ विद्यार्थी तर सिंधुदुर्गमधून ४ हजार ६७२ विद्यार्थी बसणार आहेत. वाणिज्य शाखेमधून सर्वाधिक १२ हजार ८६५ विद्यार्थी बसणार आहेत. विज्ञान शाखेमधून रत्नागिरी जिल्ह्यातून ५ हजार ३७३ तर सिंधुदुर्गमधून २ हजार ६९५ विद्यार्थी बसणार आहेत. व्यावसायिक शाखेमधून रत्नागिरी जिल्ह्यातील ६९७ तर सिंधुदुर्गमधून ११८१ विद्यार्थी बसणार आहेत. ४८ अतिरिक्त विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत.परीक्षांचे संचलन गैरमार्ग मुक्त व्हावे यासाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकूण १४ भरारी पथके निर्माण केली आहेत. तसेच ५ विभागीय मंडळ सदस्यांना केंद्र भेटीसाठी नियुक्त करण्यात आले आहे.परीक्षा संचलनासाठी आवश्यक त्या सर्व बैठका कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आल्या आहेत. केंद्रप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, परिरक्षक यांना स्वतंत्र सभा घेऊन गैरमार्ग मुक्त व तणावरहित परीक्षा घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची बैठक व्यवस्थाही त्या त्या महाविद्यालयांना कळवण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा ्रकेंद्रावर पोहोचावे, असे आवाहन परीक्षा मंडळातर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)कोकण विभागीय शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये परीक्षा तणावरहित वातावरणात घेण्याच्या दृष्टीने संबंधितांना सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्याने मुक्त वातावरणात परीक्षा देणे आवश्यक आहे. कोकण विभाग गैरमार्ग मुक्त परीक्षा घेण्यात राज्यात अव्वल आहे. यावर्षीही हा बहुमान टिकवण्याच्या दृष्टीने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे आवश्यक समुपदेशन करण्यात आले आहे. यामुळे यावर्षीदेखील कोकण राज्य निकालात अव्वल असेल.- आर. बी. गिरी, विभागीय सचिव