शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

३२ कोटींची फाईल परत

By admin | Updated: July 3, 2014 00:50 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने गेल्या वर्षात अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या रस्ते व पूल दुरुस्तीच्या ३२ कोटींच्या कामाचे नियोजन के ले आहे. परंतु वित्त विभागाने तांत्रिक बाबी अपूर्ण असल्याच्या

जिल्हा परिषद : अतिवृष्टीची कामे थांबल्याने आमदार अस्वस्थनागपूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने गेल्या वर्षात अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या रस्ते व पूल दुरुस्तीच्या ३२ कोटींच्या कामाचे नियोजन के ले आहे. परंतु वित्त विभागाने तांत्रिक बाबी अपूर्ण असल्याच्या कारणावरून मंजुरी न देता बुधवारी फाईल बांधकाम विभागाला परत पाठविली आहे. अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी जि.प.च्या बांधकाम विभागाने शासनाकडे १५० कोटींची मागणी केली होती. परंतु शासनाने ३२ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. बांधकाम विभागाने उपलब्ध निधीचे नियोजन करून जि.प.सदस्य व आमदारांनी सुचविलेल्या कामांचा यात समावेश केला.२२ जूनला विभागाने मंजुरीसाठी फाईल वित्त विभागाकडे पाठविली होती. परंतु विभागातील काही कर्मचाऱ्यांनी यात त्रुटी शोधल्या. इस्टीमेट नसल्याने मंजुरी देणे चुकीचे होईल, असा अभिप्राय दिला. त्यामुळे वित्त अधिकाऱ्यांनी ही फाईल परत पाठविल्याची माहिती बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. प्रस्तावित कामाच्या ठिकाणी पाहणी के ल्याशिवाय इस्टीमेट तयार होत नाही. त्यामुळे अनेकदा इस्टीमेट नसतानाही वित्त विभाग कामांना मंजुरी देतो, नंतर बिलासोबत इस्टीमेट सादर करण्यास सांगितले जाते. परंतु रस्त्यांच्या कामासाठी आधी इस्टीमेट नंतर मंजुरी, अशी भूमिका वित्त विभागाने घेतली आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीला आमदारांना सामोरे जावे लागणार असल्याने, अतिवृष्टीच्या निधीतून तातडीने कामे व्हावी यासाठी काही आमदारांनी जि.प.मध्ये रात्रीला बैठका घेतल्या. कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना केल्या. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होण्याची शक्यता नसली तरी, निदान भूमिपूजन करता यावे यासाठी आमदारांची धावपळ सुरू आहे. परंतु वित्त विभागाने कायद्यावर बोट ठेवल्याने आमदार अस्वस्थ झाले आहेत.नादुरुस्त रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे ग्रामीण भागात रोष आहे. अतिवृष्टीचा निधी तातडीने खर्च करण्याचे शासनाचे निर्देश आहे. परंतु निविदा प्रक्रि येला विलंब होत असल्याने रस्त्यांची कामे नोव्हेंबरनंतरच होतील, असे मत बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)