शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

३०० शिक्षकांवर ‘कलम ३०७’

By admin | Updated: October 6, 2016 06:13 IST

मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी तब्बल ३०० शिक्षकांविरुद्ध कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि दंगलीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले

औरंगाबाद : मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी तब्बल ३०० शिक्षकांविरुद्ध कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि दंगलीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून, ५९ शिक्षकांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मंगळवारी औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राज्यभरातील शिक्षक मंडळी सहभागी झाली होती. महिला शिक्षकांची उपस्थितीही लक्षणीय होती. मात्र, या मोर्चाला हिंसक वळण लागून २१ शिक्षक आणि १३ पोलीस जखमी झाले. पोलिसांनी बळाचा वापर करत, शिक्षकांवर लाठीमार केला, असा आरोप कृती समितीने केला आहे, तर आंदोलनकर्त्यांनी अर्वाच्च भाषा वापरत, पोलिसांवर दगडफेक केल्याने जमावाला पांगविण्यासाठी सौम्य बळाचा वापर करावा लागला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.आंदोलकांवर नोंदविले गंभीर गुन्हेया घटनेनंतर औरंगाबाद पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेत, विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह तब्बल तीनशे शिक्षकांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले. यामध्ये कलम ३०७ ( खुनाचा प्रयत्न करणे), ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे) यासह दंगलीचे कलम ३३३, ३३६, ३३७, १४३, १४७, १४८, १४९ भादंविसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा कायदा १९८४ चे कलम ३ व ४ व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट १९३२ चे कलम ७ सह कलम १३५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या सर्व कलमांन्वये कोर्टात गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना मोठी शिक्षा होऊ शकते.................४७ शिक्षकांची हर्सूल कारागृहात रवानगीसर्व आरोपी शिक्षकांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने १२ पदाधिकाऱ्यांना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर ४७ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. त्या ४७ जणांची रात्री उशिरा हर्सूलमध्ये रवानगी करण्यात आली. या शिक्षकांमध्ये राहुल भोसले (रा. बेलोरो, जाफराबाद, जालना), भास्कर कड (रा. जाफराबाद, जालना), गणेश शेळके (रा. बेलोरोे, जालना), शंकर उर्किडे (रा. टेंभुर्णी, जालना), सुदेश मोरे (रा. सुंदरखेड, बुलडाणा), सुनील दुमाने (रा. वसमत, हिंगोली), सिद्धार्थ कोंगराव (रा. दैठणा, परभणी), तुकाराम कदम (रा. संतसेनानगर, परभणी), गजानन देशमुख (रा. परभणी), मुंजाजी शिंदे (रा. धसाडी, परभणी), विलास आवारे (रा. चिखली, आष्टी, बीड), अर्जुन पाखरे (रा. रांजणगाव, औरंगाबाद), शेख मुबीन (रा. मुदखेड, नांदेड), शेख इर्शाद (रा. लोणार, बुलडाणा), इरफान खान (रा. रिसोड, वाशिम), शेख नय्युम (रा. वाघी, वाशिम), अर्जुन पळसकर (रा. पळशी, औरंगाबाद), सईद खान (रा. रिसोड, वाशिम), मोहंमद नदीम (रा. वाशिम), लक्ष्मण घ्यार (रा. शेणगाव, हिंगोली), संतोष राठोड (रा. जांभळी, भोकर, नांदेड), सुरेश गवळी (रा. सिडको, औरंगाबाद), चतुर्भुज लोकरे (रा. बेगळी, उस्मानाबाद), महादेव पट्टे (रा. काकरंबा, तुळजापूर), प्रवीण काळे (रा. पुंडलिकनगर, औरंगाबाद), विलास घोंगे (रा. देऊळगाव राजा, बुलडाणा), रामेश्वर पवार (रा. आसेगाव, रिसोड, वाशिम), अनिल भावसार (रा. शिंगापूर, अक्कलकुवा, नंदुरबार), विजय द्वारकुंडे (रा. जयभवानीनगर, औरंगाबाद), गणेश पवार (रा. आनंदनगर, औरंगाबाद), श्रीकांत गरुड (रा. वरखेड, पालम, परभणी), संतोष देशमुख (रा. केज, बीड), रंगनाथ भोपळे (रा. जाफराबाद, जालना), भरत शेळके (रा. देऊळगाव राजा, बुलडाणा), सुभराव पवार (रा. बोरगाव, केज, बीड), संदीप किरतकर (रा. पाथूर, अकोला), संदीप पवार (रा. ननासी, दिंडोरी, नाशिक), अनिल पगार (रा. ननासी, नाशिक), अमर पाटील (रा. जयसिंगपूर, कोल्हापूर), भाऊसाहेब काळे (रा. सिडको, औरंगाबाद), सचिन पाचबोले (रा. पातूर, अकोला), आदिनाथ अडसरे (रा. रांजणगाव, औरंगाबाद), रमेश उकर्डे (रा. टेंभुर्णी, जालना), मच्छिंद्र जाधव (रा. शिरोळ, कोल्हापूर), प्रदीप कोळी (रा. शिरोळ, कोल्हापूर), नीलेश गरुड (रा. विराणे, मालेगाव), कैलास पाबळे (पानेवाडी, जालना) या शिक्षकांचा समावेश आहे. .....................अटकेत असलेले पदाधिकारीसीताराम म्हसकर (रा. मापोडा, खालापूर, राजगड), मनोज पाटील (रा. बालजीनगर, औरंगाबाद), खंडेराय जगदाळे (रा. शिरोळ, कोल्हापूर), शिवराम म्हस्के (रा. बोरसर, कन्नड, औरंगाबाद), वाल्मीक सुरासे (रा. तिरुपती पार्क, सिडको, औरंगाबाद), रवींद्र मंडावर (रा. वैजापूर, औरंगाबाद), मिर्झा सलीम बेग (रा. सादातनगर, औरंगाबाद), अन्सारी मोहंमद जावेद (रा. लेबर कॉलनी परिसर, औरंगाबाद), अभिजित कदम (रा. पूर्णा, परभणी), रमेश देशमुख (रा. पाथरी, परभणी), संदीप देवरे (रा. गारखेडा, भोकरदन, जालना), दीपक इंगळे (रा. सातगाव, म्हसला, बुलडाणा) या १२ पदाधिकाऱ्यांना न्यायालयाने १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.