शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Corona Virus: राज्यात दहा दिवसांत आढळले तब्बल 30 हजार काेराेनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 07:20 IST

Corona Virus: आराेग्य विभागाची माहिती; फेब्रुवारीत ४६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यासह मुंबईत पुन्हा कोरोनाच्या दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूत वाढ होताना दिसत आहे. परिणामी, राज्य शासनासह मुंबई महानगरपालिकेसमोर पुन्हा एकदा संसर्ग नियंत्रणाचे आव्हान उभे ठाकले आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यात ४६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर गेल्या दहा दिवसांत कोरोनाचे तब्बल तीस हजार रुग्ण आढळले, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मागील काही महिन्यांच्या तुलनेत कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्यात २८ हजार ७४, डिसेंबर महिन्यात २५ हजार १७७ आणि जानेवारी महिन्यात २१ हजार ६५ रुग्णांचे निदान झाले होते. या रुग्णसंख्येच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्याची संख्या पाहता प्रादुर्भाव वाढण्याच्या दृष्टिकोनातून हा सतर्कतेचा इशारा असल्याचे मत टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ शशांक जोशी यांनी मांडले आहे.मुंबई महानगर परिमंडळाच्या तुलनेत राज्यात विदर्भातील वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय आहे.  याविषयी डॉ. जोशी यांनी सांगितले, मागील दोन आठवड्यांत दैनंदिन रुग्णसंख्येत आणि गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी,  यंत्रणांसह सामान्य नागरिकांनीही हा सतर्कतेचा इशारा मानून करुणाविषयक मार्गदर्शक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मागील दोन महिन्यांत या नियमांविषयी सामान्य नागरिकांमध्ये आलेली शिथिलता हे संसर्गवाढीचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्थानिक पातळीसह  राज्य शासनाने या नियमांच्या अंमलबजावणीकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे.

किंचित दिलासा; दिवसभरात ८५५ नवे रुग्णnमुंबई : गेले चार दिवस मुंबईत एक हजाराहून अधिक काेराेना रुग्ण आढळून आले. मात्र, सोमवारी त्यात काहीशी घट झाली. दिवसभरात ८५५ नवे रुग्ण आढळून आले असून, ८७६ रुग्ण बरे झाले. 

nनवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तर, चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख २६ हजार ७७० वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा ११ हजार ४७४ वर पोहोचला आहे.nमुंबईत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३ लाख ४ हजार ७३६ वर पोहोचली आहे. सध्या ९,६९० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून, रुग्ण दुपटीचा काळ २४४ दिवस इतका आहे. 

चेंबूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी रुग्णावर गुन्हा दाखलमुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने कडक नियम लागू केले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या नियमांना बाधित रुग्ण हरताळ फासत असल्याचे समोर येत आहे. क्वारंटाइन कालावधी सुरू असताना घराबाहेर फिरणाऱ्या चेंबूर, अतुर पार्क येथील रुग्णावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी पुन्हा येथील स्वस्तिक अथर्व या इमारतीत बाधित बाहेर फिरत असल्याने पालिकेने त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या रुग्णाचा  १४ दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी ४ मार्च २०२१ रोजी पूर्ण होईल. मात्र, त्याआधी ताे  बिनधास्तपणे घराबाहेर फिरत हाेता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या