शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

सहकारी बँकांच्या खातेदारांनी केले ठेव विम्याचे १४ हजार कोटींचे दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 04:39 IST

रिझर्व्ह बँकेने दिली सप्टेंबर अखेरची आकडेवारी

मुंबई : सुमारे ६,५००कोटी रुपयांच्या घोटाळयाने पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँक बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच देशभरातील अडचणीत आलेल्या सहकारी बँकांच्या खातेदारांनी ‘ठेव विमा आणि कर्ज हमी महामंडळा’कडे त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी सुमारे १४,१०० कोटी रुपयांचे दावे दाखल केले असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे.रिझर्व्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या ‘फिनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट’मध्ये सप्टेंबर २०१९ अखेरची आकडेवारी देताना ही माहिती दिली आहे. मात्र सर्व ठेवीदारांना या दाव्यांची रक्कम येकाच वेळी देण्याची वेळ येणार नाही किंवा बऱ्याच दाव्यांची रक्कम कदाचित द्यावीही लागणार नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.ज्या बँकांवर निर्बंध लागू केले आहेत, ज्या बँका अवसायनात काढण्याचेआदेश झाले आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे अशा बँकांच्या ठेवीदारांनी दाखल केलेल्या दाव्यांची एकूण रक्कम १४,०९८ कोटी रुपये आहे. याची फोड देताना अहवालात म्हटले आहे की, यापैकी ३,४१४ कोटी रुपयांचे दावे राज्य सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांसंबंधीचे तर १०, ६८४ कोटी रुपयांचे दावे ‘पीएससी’ सह अन्य नागरी बँकांसंबंधीचे आहेत.देशातील अनेक सहकारी बँकांची स्थिती सध्या नाजूक असून त्यांची प्रकरणे रिझर्व्ह बँक निरनिराळ््या स्तरांवर हाताळत आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ३० सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमले आहेत. ठेवविमा कायद्यानुसार ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम विमा महामंडळाकडून देण्याची तरतूद आहे.असे असले तरी अशा सर्व बँकांच्या ठेवीदारांना एकाच वेळी विम्याचे पैसे देण्याची वेळ येणार नाही किंवा सध्या आजारी असलेल्या काही बँकांची आर्थिक स्थिती कालांतराने सुधारुही शकेल. त्यामुळे १४ हजार कोटी रुपयांचे दावे दाखल होणे ही असामान्य परिस्थिती नाही, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.‘पीएमसी’ बँकेतील घोटाळा हा अलिकडच्या काळातील सहकारी बँकांमधील उघड झालेला सर्वात मोठा घोटाळा आहे. सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता व ११,८०० कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या या बँकेत सुमारे ६,५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा झाला आहे. म्हणजेच बँकेचे ७३ टक्के अधिमूल्य या घोटाळ्याने कमी झाले आहे. दिवाळखोरीत गेलेल्या ‘एचडीआयएल’ या एकाच कंपनीला गेल्या ११ वर्षांत दिलेल्या कर्जांमध्ये हा घोटाळा झाला आहे.