शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांच्या खातेदारांनी केले ठेव विम्याचे १४ हजार कोटींचे दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 04:39 IST

रिझर्व्ह बँकेने दिली सप्टेंबर अखेरची आकडेवारी

मुंबई : सुमारे ६,५००कोटी रुपयांच्या घोटाळयाने पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँक बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच देशभरातील अडचणीत आलेल्या सहकारी बँकांच्या खातेदारांनी ‘ठेव विमा आणि कर्ज हमी महामंडळा’कडे त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी सुमारे १४,१०० कोटी रुपयांचे दावे दाखल केले असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे.रिझर्व्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या ‘फिनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट’मध्ये सप्टेंबर २०१९ अखेरची आकडेवारी देताना ही माहिती दिली आहे. मात्र सर्व ठेवीदारांना या दाव्यांची रक्कम येकाच वेळी देण्याची वेळ येणार नाही किंवा बऱ्याच दाव्यांची रक्कम कदाचित द्यावीही लागणार नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.ज्या बँकांवर निर्बंध लागू केले आहेत, ज्या बँका अवसायनात काढण्याचेआदेश झाले आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे अशा बँकांच्या ठेवीदारांनी दाखल केलेल्या दाव्यांची एकूण रक्कम १४,०९८ कोटी रुपये आहे. याची फोड देताना अहवालात म्हटले आहे की, यापैकी ३,४१४ कोटी रुपयांचे दावे राज्य सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांसंबंधीचे तर १०, ६८४ कोटी रुपयांचे दावे ‘पीएससी’ सह अन्य नागरी बँकांसंबंधीचे आहेत.देशातील अनेक सहकारी बँकांची स्थिती सध्या नाजूक असून त्यांची प्रकरणे रिझर्व्ह बँक निरनिराळ््या स्तरांवर हाताळत आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ३० सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमले आहेत. ठेवविमा कायद्यानुसार ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम विमा महामंडळाकडून देण्याची तरतूद आहे.असे असले तरी अशा सर्व बँकांच्या ठेवीदारांना एकाच वेळी विम्याचे पैसे देण्याची वेळ येणार नाही किंवा सध्या आजारी असलेल्या काही बँकांची आर्थिक स्थिती कालांतराने सुधारुही शकेल. त्यामुळे १४ हजार कोटी रुपयांचे दावे दाखल होणे ही असामान्य परिस्थिती नाही, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.‘पीएमसी’ बँकेतील घोटाळा हा अलिकडच्या काळातील सहकारी बँकांमधील उघड झालेला सर्वात मोठा घोटाळा आहे. सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता व ११,८०० कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या या बँकेत सुमारे ६,५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा झाला आहे. म्हणजेच बँकेचे ७३ टक्के अधिमूल्य या घोटाळ्याने कमी झाले आहे. दिवाळखोरीत गेलेल्या ‘एचडीआयएल’ या एकाच कंपनीला गेल्या ११ वर्षांत दिलेल्या कर्जांमध्ये हा घोटाळा झाला आहे.